Skip to main content

बाबांनो ! 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधला फरक तरी लक्षात घ्या !

भारतात कोणताही सण , वार फक्त साजरा करण्याची एक घाण सवय लागली आहे. आम्हाला फक्त सण साजरे करता येतात तो सण वार का साजरा करतात ? त्याचा इतिहास काय ? भविष्य काय ? कोणी सुरू केला ? त्यातल चांगलं काय वाईट काय ? असले प्रश्न विचारायची सवय कधी भारतीयांना लागणार देव जाणे !
         आज 26 जानेवारी म्हणजे स्वतंत्र दिन नाही ! हे 90 टक्के भारतीयांना माहीतच नाही ...फक्त आम्ही शाळांच्या आणि सरकारी कार्यालयात जाणार सॅल्युट मारणार ,काही खायला भेटलं तर ठीक आहे नाहीतर येणार हात हलवत परत...

           15 ऑगस्ट म्हणजे भारताला फक्त राजकीय स्वतंत्र मिळाले तो दिवस . इंग्रज 1947 ला गेले म्हणून राजकीय नेते आनंदी होते ..
गरिबांना काय मिळाल ? शोषितांना काय मिळालं ? दलितांना काय मिळाल ? शेतकरी , स्त्रियांना काय मिळालं ? या सर्व घरकांना न्याय , हक्क ,देण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950
         26 जानेवारी म्हणजे भारतीयांना लोकशाही , सार्वभौमत्व , संविधान  आणि आर्थिक , सामाजिक स्वतंत्र वयक्तिक स्वतंत्र आणि हक्क मिळण्याचा दिवस ..याच दिवशी डॉक्टर आंबेडकरांच्या हातून भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संविधान स्वीकारले आणि अंगीकृत केले .
            26 जानेवारीने भारताला काय दिल ?
1) निवड प्रक्रियेत सर्व 18 वर्षावरील भारतीयांना सहभाग घेण्याची संधी !
2) 1 मत 1 मूल्य ( अंबानी आणि रस्त्यावरच्या भिकार्याच्या मताचे मूल्य एकच ) 
या गोष्टीची किंमत भारतीयांना 75 वर्षानंतर कळली का नाही हा प्रश्न आहे ?
3) भारतभर राहण्याची , फिरण्याची , भाषणाची , आंदोलन करण्याची , लिहण्याचे स्वतंत्र ! 
4) " आज लोकशाहीला मुजरा करती रंक आणि राव "

( सर्वांना कायदा समान लागू करण्यात आला राजेशाहीचा आधीकृत अंत  ह्या दिवसापासून झाला )
5) जातीवाद , untochability चा अंत म्हणजे 2000 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांना सुरुंग लावण्यात आला..
6) जाती - धर्म - लिंग यावरून कोणाला कमी लेखता येणार नाही ! 
7) "समानतेचा हक्क "
8) कलम  19 अंतर्गत वयक्तिक स्वतंत्र .
9) (freedom of Expression )   भाषण , लिखाणातून व्यक्त  होण्याचे स्वतंत्र ...
10) गरीब आणि दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदि !
11) अल्पसंख्याक समाजाला संरक्षन 
12) Sc St आरक्षण
13)महिलांच्या शिक्षणासाठी विशेष तरतुदी !
14)प्राथमिक शिक्षण मोफत !
 

पीडित , गरीब , शोषित ,स्त्रिया , यांच्या साठी हा दिवस "सोन्या " प्रमाणेच...
भारतिय म्हणून आपण  आज काँग्रेस ,नेहरू , आणि आंबेडकरांना धन्यवाद म्हणण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी ..

शेवटी 26 जानेवारी पासून
 तिरंगा झालाय नामी !
त्याला साऱ्या देशाची सलामी !
कार्य भीमाच आलंय कामी !



Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...