Skip to main content

बाबांनो ! 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधला फरक तरी लक्षात घ्या !

भारतात कोणताही सण , वार फक्त साजरा करण्याची एक घाण सवय लागली आहे. आम्हाला फक्त सण साजरे करता येतात तो सण वार का साजरा करतात ? त्याचा इतिहास काय ? भविष्य काय ? कोणी सुरू केला ? त्यातल चांगलं काय वाईट काय ? असले प्रश्न विचारायची सवय कधी भारतीयांना लागणार देव जाणे !
         आज 26 जानेवारी म्हणजे स्वतंत्र दिन नाही ! हे 90 टक्के भारतीयांना माहीतच नाही ...फक्त आम्ही शाळांच्या आणि सरकारी कार्यालयात जाणार सॅल्युट मारणार ,काही खायला भेटलं तर ठीक आहे नाहीतर येणार हात हलवत परत...

           15 ऑगस्ट म्हणजे भारताला फक्त राजकीय स्वतंत्र मिळाले तो दिवस . इंग्रज 1947 ला गेले म्हणून राजकीय नेते आनंदी होते ..
गरिबांना काय मिळाल ? शोषितांना काय मिळालं ? दलितांना काय मिळाल ? शेतकरी , स्त्रियांना काय मिळालं ? या सर्व घरकांना न्याय , हक्क ,देण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950
         26 जानेवारी म्हणजे भारतीयांना लोकशाही , सार्वभौमत्व , संविधान  आणि आर्थिक , सामाजिक स्वतंत्र वयक्तिक स्वतंत्र आणि हक्क मिळण्याचा दिवस ..याच दिवशी डॉक्टर आंबेडकरांच्या हातून भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संविधान स्वीकारले आणि अंगीकृत केले .
            26 जानेवारीने भारताला काय दिल ?
1) निवड प्रक्रियेत सर्व 18 वर्षावरील भारतीयांना सहभाग घेण्याची संधी !
2) 1 मत 1 मूल्य ( अंबानी आणि रस्त्यावरच्या भिकार्याच्या मताचे मूल्य एकच ) 
या गोष्टीची किंमत भारतीयांना 75 वर्षानंतर कळली का नाही हा प्रश्न आहे ?
3) भारतभर राहण्याची , फिरण्याची , भाषणाची , आंदोलन करण्याची , लिहण्याचे स्वतंत्र ! 
4) " आज लोकशाहीला मुजरा करती रंक आणि राव "

( सर्वांना कायदा समान लागू करण्यात आला राजेशाहीचा आधीकृत अंत  ह्या दिवसापासून झाला )
5) जातीवाद , untochability चा अंत म्हणजे 2000 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांना सुरुंग लावण्यात आला..
6) जाती - धर्म - लिंग यावरून कोणाला कमी लेखता येणार नाही ! 
7) "समानतेचा हक्क "
8) कलम  19 अंतर्गत वयक्तिक स्वतंत्र .
9) (freedom of Expression )   भाषण , लिखाणातून व्यक्त  होण्याचे स्वतंत्र ...
10) गरीब आणि दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदि !
11) अल्पसंख्याक समाजाला संरक्षन 
12) Sc St आरक्षण
13)महिलांच्या शिक्षणासाठी विशेष तरतुदी !
14)प्राथमिक शिक्षण मोफत !
 

पीडित , गरीब , शोषित ,स्त्रिया , यांच्या साठी हा दिवस "सोन्या " प्रमाणेच...
भारतिय म्हणून आपण  आज काँग्रेस ,नेहरू , आणि आंबेडकरांना धन्यवाद म्हणण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी ..

शेवटी 26 जानेवारी पासून
 तिरंगा झालाय नामी !
त्याला साऱ्या देशाची सलामी !
कार्य भीमाच आलंय कामी !



Comments

Popular posts from this blog

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

पुण्यामध्ये घर कर्ज घ्यायचे आहे ? पण सॅलरी स्लिप किंवा ITR नाही , तरी पण ही कंपनी तुम्हाला कर्ज 100% देईल !

🏙️ पुण्यासारख्या शहरात स्वतःचं घर घेणं — प्रत्येकाचं स्वप्न! पण सॅलरी स्लिप, ITR नसलेल्या मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांसाठी हे स्वप्न अपूर्णच राहतं... कारण सरकारी व मोठ्या बँका "ना" म्हणतात. 📢 पण आता काळजी करण्याचं कारण नाही! गेल्या 15 वर्षांपासून, 140+ शाखा, 1 लाखांहून अधिक समाधानी ग्राहक, आणि फक्त 48 तासांत गृहकर्ज मंजूरीची हमी देणारी कंपनी घेऊन आली आहे तुमच्यासारख्यांसाठी खास योजना! 👨‍💼 प्रत्येक ग्राहकासाठी: • स्वतंत्र रिलेशनशिप मॅनेजर • घरपोच सेवा • 90% पर्यंत Loan-to-Value (उदा. ₹30 लाख प्रॉपर्टी साठी ₹27 लाख कर्ज) - प्रधानमंत्री PMAY सबसिडी 2.50 लाखापर्यंत .. 💼 खास कोणी साठी? • Swiggy/Zomato डिलिव्हरी बॉय • फळ-भाजी विक्रेते • वडापाव/चहाचे दुकानदार • छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे • सॅलरी स्लिप/ITR नसलेले कुटुंबीय 👪 कंपनी कुटुंबाचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरते! उदा. वडील पेन्शन ₹15,000 मुलगा चहाचा गाडा ₹20,000 पत्नी घरकाम ₹15,000 ➡️ एकूण ₹50,000 ग्राह्य मानलं जातं! 📌 महत्त्वाचं: 1️⃣ कर्ज Mortgage स्वरूपात दिलं जातं (प्रॉपर्टीच्या नावे) 2️⃣ 50 ते 60 लाखांपर्यंत कर्...