Skip to main content

बाबांनो ! 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधला फरक तरी लक्षात घ्या !

भारतात कोणताही सण , वार फक्त साजरा करण्याची एक घाण सवय लागली आहे. आम्हाला फक्त सण साजरे करता येतात तो सण वार का साजरा करतात ? त्याचा इतिहास काय ? भविष्य काय ? कोणी सुरू केला ? त्यातल चांगलं काय वाईट काय ? असले प्रश्न विचारायची सवय कधी भारतीयांना लागणार देव जाणे !
         आज 26 जानेवारी म्हणजे स्वतंत्र दिन नाही ! हे 90 टक्के भारतीयांना माहीतच नाही ...फक्त आम्ही शाळांच्या आणि सरकारी कार्यालयात जाणार सॅल्युट मारणार ,काही खायला भेटलं तर ठीक आहे नाहीतर येणार हात हलवत परत...

           15 ऑगस्ट म्हणजे भारताला फक्त राजकीय स्वतंत्र मिळाले तो दिवस . इंग्रज 1947 ला गेले म्हणून राजकीय नेते आनंदी होते ..
गरिबांना काय मिळाल ? शोषितांना काय मिळालं ? दलितांना काय मिळाल ? शेतकरी , स्त्रियांना काय मिळालं ? या सर्व घरकांना न्याय , हक्क ,देण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950
         26 जानेवारी म्हणजे भारतीयांना लोकशाही , सार्वभौमत्व , संविधान  आणि आर्थिक , सामाजिक स्वतंत्र वयक्तिक स्वतंत्र आणि हक्क मिळण्याचा दिवस ..याच दिवशी डॉक्टर आंबेडकरांच्या हातून भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संविधान स्वीकारले आणि अंगीकृत केले .
            26 जानेवारीने भारताला काय दिल ?
1) निवड प्रक्रियेत सर्व 18 वर्षावरील भारतीयांना सहभाग घेण्याची संधी !
2) 1 मत 1 मूल्य ( अंबानी आणि रस्त्यावरच्या भिकार्याच्या मताचे मूल्य एकच ) 
या गोष्टीची किंमत भारतीयांना 75 वर्षानंतर कळली का नाही हा प्रश्न आहे ?
3) भारतभर राहण्याची , फिरण्याची , भाषणाची , आंदोलन करण्याची , लिहण्याचे स्वतंत्र ! 
4) " आज लोकशाहीला मुजरा करती रंक आणि राव "

( सर्वांना कायदा समान लागू करण्यात आला राजेशाहीचा आधीकृत अंत  ह्या दिवसापासून झाला )
5) जातीवाद , untochability चा अंत म्हणजे 2000 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांना सुरुंग लावण्यात आला..
6) जाती - धर्म - लिंग यावरून कोणाला कमी लेखता येणार नाही ! 
7) "समानतेचा हक्क "
8) कलम  19 अंतर्गत वयक्तिक स्वतंत्र .
9) (freedom of Expression )   भाषण , लिखाणातून व्यक्त  होण्याचे स्वतंत्र ...
10) गरीब आणि दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदि !
11) अल्पसंख्याक समाजाला संरक्षन 
12) Sc St आरक्षण
13)महिलांच्या शिक्षणासाठी विशेष तरतुदी !
14)प्राथमिक शिक्षण मोफत !
 

पीडित , गरीब , शोषित ,स्त्रिया , यांच्या साठी हा दिवस "सोन्या " प्रमाणेच...
भारतिय म्हणून आपण  आज काँग्रेस ,नेहरू , आणि आंबेडकरांना धन्यवाद म्हणण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी ..

शेवटी 26 जानेवारी पासून
 तिरंगा झालाय नामी !
त्याला साऱ्या देशाची सलामी !
कार्य भीमाच आलंय कामी !



Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...