Skip to main content

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत..

1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?
2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ?
3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ?
4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ?



१)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?

             संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो , 

''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरबारात आहे .आणि दरवेळी प्रमाणे ब्राह्मण इतिहासकारांच्या भरणा ,हे  दुर्दैव महाराष्ट्रच की इतिहास संशोधक हे इतिहास संशोधक नसून राजकीय पक्षांना बांधलेले पाळीव प्राणी आहेत , जसा इतिहास पाहिजे तसा इतिहास हे संशोधक लिहून देतात ..आणि ही मिथक सबशेल खोटी आहेत , हे सांगण्याच सामर्थ्य ह्या संशोधक मंडळी मध्ये नाही..

                     असो , माझे काही प्रश्न आहे , या प्रश्नाचे उत्तरे महाराष्ट्राने शोधावे ,

1) औरंगजेब खरच हिंदू धर्मातील राजांना धर्मपरिवर्तन करा , म्हणून माघे लागला होता तर , त्याच्या दरबारात असणाऱ्या  ,मिर्झा राजे जयसिंग (राजपूत) आणि जसवंत सिंग यासारखे अनेक राजपूत , शीख, गुज्जर, मराठा, ब्राह्मण वकील , असतील तेव्हा औरंगजेब ने त्यांचं धर्मपरिवर्तन का केलं नाही ? संभाजी महाराजच का ?

2) संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने रायगड काबीज केला अनेक मराठा सरदार , शाहू महाराज(संभाजी महाराजांचे पुत्र) संभाजी महाराजांच्या पत्नी औरंजेबाने कैद केलेले होते , जवळ जवळ18 वर्ष ते कैदेत होते तेव्हा औरंगजेब ने त्यांचे धर्मपरिवर्तन का केले नाही ? संभाजी महाराज च का ?
यावर अनेक जण बोलतील तू औरंगजेब प्रेमी आहेस ..पण मित्रांनो आपण असा मिथकांवर आधारित इतिहास जेव्हा पुढच्या पिढीकडे जाईल , तेव्हा एक ना एक दिवस हा सगळा फुगा फुटणार आहे ...

२)) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ?

                आंबेडकरी चळवळीतील तथाकथीत इतिहासकारांनी  हे मिथक खूप हुशारीने पेरलं , आहे आणि डाव्यांनी खासकरून पिवळ्या इतिहासकारांनी promote करण्याच काम केलं आहे...आणि भीमा कोरेगाव चा इतिहास आणि जवकच वढू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे, 
                      एका इतिहासाला दुसऱ्या इतिहासाशी जोडण्याच काम केलं आहे..

संभाजी महाराज यांचं निधन 1689 आणि भीमकोरेगाव ची लढाई 1818 महार समाजाने 130 वर्षाच्या नंतर इंग्रजांकडून लढून , पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करून  130 वर्षांपूर्वी झालेले संभाजी महाराजांचा बदला घेतला ? का ? कशामुळे ? गरज काय ? हे अनुउत्तरीत प्रश्न दावे आणि उजवे इतिहास संशोधक विचारायला भितात हे महाराष्ट्रच दुर्दैव ..

विशेष म्हणजे या खोट्या इतिहासावर गाणी सुद्धा आलेली आहेत .

 

३) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ?

याची सुरुवात होते संभाजी महाराजांना रामदास स्वामी यांनी पकडून दिले येथून नंतर..


 ब्राह्मणांनी औरंगजेबास सांगितलं की याने मुस्लिम धर्मास धोका केला , नाही परंतु आमच्या वैदिक धर्माशी धोका केला आहे कारण ..
:- संभाजीने समुद्र पर्यटन केले
:- स्त्रियांना समान वागणूक दिली
:- शेतकऱ्यांना पाणी दिले

:- संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला म्हनून तुम्ही संभाजी चे दोन्ही डोळे , हात ,पाय , कापा ..

 हे आणखी  एक  मिथक ब्रिगेडी इतिहास कारांनी पेरलं आहे , यामध्ये श्रीमंत कोकाटे यांच नाव अग्रस्थानि आहे .संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी पकडून देऊन ,त्यांनी ' ' ' बुधभूषण ' हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहला म्हणून , ब्राह्मणांनानी औरंगजेबास सांगून , संभाजी महाराजांची क्रूर हत्या करायला लावली..

ह्या कोणत्याही इतिहासाला पुरावा नावाची गोष्ट आजतागायत भेटली नाही.
ब्राह्मणांची बदनामी हेच काही ते निमित्त..
मला मान्य आहे की संभाजी महाराजांच्या दरबारातील ब्राह्मणांनी गद्दारी केली , पण ती जाती मुळे नव्हे , अशा प्रउत्ती प्रत्येक समाजात वावरताना दिसतात..

४)संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ?

             

 संभाजी महाराजांच्या हत्या ही गुढीपाडवा च्या दिवशी झाल्यामुळे , ब्राह्मणांनी त्या दिवसापासून गुढीपाडवा हा सण साजरा करतात.त्यामुळे मराठी माणसांनी गुढीपाडवा सण साजरा करू नये ..कारण गुढीच्या वरती तांब्या लावतात तो संभाजी महाराजांचे मुंडके आहे  , लिंबाचा पाला आपण देहाची माती झाल्यानंतर वापरतो तोच लिंबाचा पाला आपण गुढीपाडव्याला वापरतो ..संभाजी महाराजांच्या क्रूर निधनानंतर ब्राह्मण हातात एक बांबू आणि त्यावर संभाजी महाराजांचे मुंडके घेऊन आनंदाने नाचत होती व त्या दिवसापासून महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जातो ...

               मुळात गुढीपाडवा सण ला हजारो वर्षांपासून चा इतिहास आहे .. महाराष्ट्रातील सातवाहनांनी शकांचा केलेला पाडावापासून इसवी सन 75 पासून आपण गुढीपाडवा सण साजरा करतो , रामाचा आणि गुढीपाडवा सणाचा सुद्धा काही संबंध नाही हे इतिहासकारांनी वारंवार लिहले आहे ..असो तो इतिहास आपण एका वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगतो ...

हे म्हणजे किती अति केलाय ह्या इतिहासकारांनि देव जाणे , विशेष म्हणजे हे इतिहासकार आज समाजात वावरताना ह्या गोष्टींचा अभिमान आहे असे बोलत फिरतात, अमोल मीटकरी , आंधळे बाई, ह्यांनी तर आंबेडकरी विचार मंचावर जाऊन तोंडातून वाटेल ते संभाजी महाराजांवर बोलले आहेत ..
ह्याचा छुपा हेतू संभाजी महाराजांना डाव्या चळवळीची जोडून घेऊन ,ब्राहमण आणि मराठा समाजाच सामाजिक खच्चीकरण करणे हेच ..
                  संभाजी महाराजांच्या वर खरच प्रेम करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासावर निष्ठा असणाऱ्या मावळ्यांनी डाव्या आणि उजव्या चळवळी पासून फारकत घेऊन इतिहास हा इतिहास म्हणून वाचवा ..
जशी पंढरपूर च्या विठ्ठलाची मिथक वेळेनुसार बनली त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची कृपया करून मिथके बनून देऊ नका !
       मी यावर एकच गोष्ट बोलेल धन्य ते इतिहासकार आणि धन्य ते या इतिहासकारांना साथ देणारे नेते...
पुरावे ,चाचपणी न करता फक्त आपल्या चळवळीला आणि पक्षांना कसा फायदा होईल हे पाहनारे आपले नेते आणि इतिहासकार ....


वाचण्यासाठी धन्यवाद ! आभारी आहे ! 
जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय भीम !




                       







Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...