Skip to main content

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत..

1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?
2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ?
3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ?
4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ?



१)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?

             संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो , 

''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरबारात आहे .आणि दरवेळी प्रमाणे ब्राह्मण इतिहासकारांच्या भरणा ,हे  दुर्दैव महाराष्ट्रच की इतिहास संशोधक हे इतिहास संशोधक नसून राजकीय पक्षांना बांधलेले पाळीव प्राणी आहेत , जसा इतिहास पाहिजे तसा इतिहास हे संशोधक लिहून देतात ..आणि ही मिथक सबशेल खोटी आहेत , हे सांगण्याच सामर्थ्य ह्या संशोधक मंडळी मध्ये नाही..

                     असो , माझे काही प्रश्न आहे , या प्रश्नाचे उत्तरे महाराष्ट्राने शोधावे ,

1) औरंगजेब खरच हिंदू धर्मातील राजांना धर्मपरिवर्तन करा , म्हणून माघे लागला होता तर , त्याच्या दरबारात असणाऱ्या  ,मिर्झा राजे जयसिंग (राजपूत) आणि जसवंत सिंग यासारखे अनेक राजपूत , शीख, गुज्जर, मराठा, ब्राह्मण वकील , असतील तेव्हा औरंगजेब ने त्यांचं धर्मपरिवर्तन का केलं नाही ? संभाजी महाराजच का ?

2) संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने रायगड काबीज केला अनेक मराठा सरदार , शाहू महाराज(संभाजी महाराजांचे पुत्र) संभाजी महाराजांच्या पत्नी औरंजेबाने कैद केलेले होते , जवळ जवळ18 वर्ष ते कैदेत होते तेव्हा औरंगजेब ने त्यांचे धर्मपरिवर्तन का केले नाही ? संभाजी महाराज च का ?
यावर अनेक जण बोलतील तू औरंगजेब प्रेमी आहेस ..पण मित्रांनो आपण असा मिथकांवर आधारित इतिहास जेव्हा पुढच्या पिढीकडे जाईल , तेव्हा एक ना एक दिवस हा सगळा फुगा फुटणार आहे ...

२)) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ?

                आंबेडकरी चळवळीतील तथाकथीत इतिहासकारांनी  हे मिथक खूप हुशारीने पेरलं , आहे आणि डाव्यांनी खासकरून पिवळ्या इतिहासकारांनी promote करण्याच काम केलं आहे...आणि भीमा कोरेगाव चा इतिहास आणि जवकच वढू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे, 
                      एका इतिहासाला दुसऱ्या इतिहासाशी जोडण्याच काम केलं आहे..

संभाजी महाराज यांचं निधन 1689 आणि भीमकोरेगाव ची लढाई 1818 महार समाजाने 130 वर्षाच्या नंतर इंग्रजांकडून लढून , पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करून  130 वर्षांपूर्वी झालेले संभाजी महाराजांचा बदला घेतला ? का ? कशामुळे ? गरज काय ? हे अनुउत्तरीत प्रश्न दावे आणि उजवे इतिहास संशोधक विचारायला भितात हे महाराष्ट्रच दुर्दैव ..

विशेष म्हणजे या खोट्या इतिहासावर गाणी सुद्धा आलेली आहेत .

 

३) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ?

याची सुरुवात होते संभाजी महाराजांना रामदास स्वामी यांनी पकडून दिले येथून नंतर..


 ब्राह्मणांनी औरंगजेबास सांगितलं की याने मुस्लिम धर्मास धोका केला , नाही परंतु आमच्या वैदिक धर्माशी धोका केला आहे कारण ..
:- संभाजीने समुद्र पर्यटन केले
:- स्त्रियांना समान वागणूक दिली
:- शेतकऱ्यांना पाणी दिले

:- संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला म्हनून तुम्ही संभाजी चे दोन्ही डोळे , हात ,पाय , कापा ..

 हे आणखी  एक  मिथक ब्रिगेडी इतिहास कारांनी पेरलं आहे , यामध्ये श्रीमंत कोकाटे यांच नाव अग्रस्थानि आहे .संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी पकडून देऊन ,त्यांनी ' ' ' बुधभूषण ' हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहला म्हणून , ब्राह्मणांनानी औरंगजेबास सांगून , संभाजी महाराजांची क्रूर हत्या करायला लावली..

ह्या कोणत्याही इतिहासाला पुरावा नावाची गोष्ट आजतागायत भेटली नाही.
ब्राह्मणांची बदनामी हेच काही ते निमित्त..
मला मान्य आहे की संभाजी महाराजांच्या दरबारातील ब्राह्मणांनी गद्दारी केली , पण ती जाती मुळे नव्हे , अशा प्रउत्ती प्रत्येक समाजात वावरताना दिसतात..

४)संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ?

             

 संभाजी महाराजांच्या हत्या ही गुढीपाडवा च्या दिवशी झाल्यामुळे , ब्राह्मणांनी त्या दिवसापासून गुढीपाडवा हा सण साजरा करतात.त्यामुळे मराठी माणसांनी गुढीपाडवा सण साजरा करू नये ..कारण गुढीच्या वरती तांब्या लावतात तो संभाजी महाराजांचे मुंडके आहे  , लिंबाचा पाला आपण देहाची माती झाल्यानंतर वापरतो तोच लिंबाचा पाला आपण गुढीपाडव्याला वापरतो ..संभाजी महाराजांच्या क्रूर निधनानंतर ब्राह्मण हातात एक बांबू आणि त्यावर संभाजी महाराजांचे मुंडके घेऊन आनंदाने नाचत होती व त्या दिवसापासून महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जातो ...

               मुळात गुढीपाडवा सण ला हजारो वर्षांपासून चा इतिहास आहे .. महाराष्ट्रातील सातवाहनांनी शकांचा केलेला पाडावापासून इसवी सन 75 पासून आपण गुढीपाडवा सण साजरा करतो , रामाचा आणि गुढीपाडवा सणाचा सुद्धा काही संबंध नाही हे इतिहासकारांनी वारंवार लिहले आहे ..असो तो इतिहास आपण एका वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगतो ...

हे म्हणजे किती अति केलाय ह्या इतिहासकारांनि देव जाणे , विशेष म्हणजे हे इतिहासकार आज समाजात वावरताना ह्या गोष्टींचा अभिमान आहे असे बोलत फिरतात, अमोल मीटकरी , आंधळे बाई, ह्यांनी तर आंबेडकरी विचार मंचावर जाऊन तोंडातून वाटेल ते संभाजी महाराजांवर बोलले आहेत ..
ह्याचा छुपा हेतू संभाजी महाराजांना डाव्या चळवळीची जोडून घेऊन ,ब्राहमण आणि मराठा समाजाच सामाजिक खच्चीकरण करणे हेच ..
                  संभाजी महाराजांच्या वर खरच प्रेम करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासावर निष्ठा असणाऱ्या मावळ्यांनी डाव्या आणि उजव्या चळवळी पासून फारकत घेऊन इतिहास हा इतिहास म्हणून वाचवा ..
जशी पंढरपूर च्या विठ्ठलाची मिथक वेळेनुसार बनली त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची कृपया करून मिथके बनून देऊ नका !
       मी यावर एकच गोष्ट बोलेल धन्य ते इतिहासकार आणि धन्य ते या इतिहासकारांना साथ देणारे नेते...
पुरावे ,चाचपणी न करता फक्त आपल्या चळवळीला आणि पक्षांना कसा फायदा होईल हे पाहनारे आपले नेते आणि इतिहासकार ....


वाचण्यासाठी धन्यवाद ! आभारी आहे ! 
जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय भीम !




                       







Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...