Skip to main content

एक एकरात हा धंदा करून कमवा 50000 महिना !

आज शेतकऱ्यांची पोर संभ्रमाच्या अवस्थेत आहेत शेतीला भाव नाही ! नोकरी नाही ! कराव तर काय करावं ! हा मोठा गहन प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर आहे...यासाठी पर्याय आणि शेतीचे भविष्य पाहून मी a
 हा" business plan " शोधला आहे ..

                   यासाठी आपल्याला
1) 1 एकर सुपीक जमीन , 
2) ठिबक सिंचन , 
3) 200 कॅरेट
4) किमान 10 गुंठामध्ये polyhouse , सुरुवातीच्या एक वर्षात नसेल  तरी चालेल, पण दुसऱ्या वर्षापासुन हवाच ..
5) social media instagram, facebook ,email marketing  करता याव! 
6)लहान रोटावेटर..
7) छोटा हत्ती टेम्पो 
8) शेणखत / कोंबडीखात/ लेंडीखात 
9) काही पिकांसाठी कुंड्या किंवा प्लॅस्टिक कुंड्या लागतील.
10) गावरान बी (देशी बियाणे )

1) सुरुवातीला एकर क्षेत्रावर नांगरणी , करून 3 टायली शेणखत टाकून घ्यावा ...
2) नंतर , 1 एकर (म्हणजे 40 गुंठे ) या सर्वांचे 9×5 गुंठे = बरोबर 45 गुंठे याप्रमाणे 9 भाग पाडावे ...
3) त्यानंतर कोथींबीर , शेपू , वांगी ,दोडका , कांदा ,
 मिरची  ,पालक , मेथी , भेंडी , आणि गवार 
4) या 9 पालेभाज्या आणि फळभाजी यांची अशाप्रकारे लागवड करून घ्यावी ,जेणेकरून 200 कुटुंबांना पुरेल अशाप्रकारे सऱ्या काढून घ्याव्यात..
5)एक एकर जास्ती असेल तर कांदा आणि काही प्रमाणात लसूण करून साठवण करून ठेवला तर दुधात साखर .

6) या नऊ भाज्या आणि बाजारातून उपलब्ध असणाऱ्या भाज्या (ताज्या) असणं खूप महत्त्वाचं आहे..
7) तुमच्या भागात होत असणाऱ्या आठवडी बाजाराच्या 2-3  दिवस आधी , social media वर विडिओ किंवा पोस्ट करणे गरजेचे आहे..
8) कारण ह्या business मध्ये (ताजेपणा ) आणि घरपोच सेवा हाच वेगळेपना आहे..
9) सर्वात आधी माझा सल्ला असेल की , स्वतःच्या गावात शक्यतो हा धंदा करू नका ..कारण उधारी होण्याची शक्यता जास्त आहे..
10 ) आणि शेवटी सकाळी लवकर उठून( 5 वाजता) सर्व भाज्या तोडून व्यवस्थित पाण्याने स्वछता करून..(कोथिंबीर )सारख्या भाज्या धुऊन त्यांचे टेठ कापून केळीच्या किंवा कापडाने बांधून ग्राहकाच्या घरी ह्या सर्व भाज्या 2 तासाच्या आत काढल्या पासून पोहचवणे गरजेचे आहे..म्हणजे सकाळी 7 -8 च्या (दरम्यान).
11) सुंदर पॅकिंग , branding , आणि गृहिणींना जास्तीच्या भाज्या स्वच्छ करणे , गहाण बाजूला काढणे , (देठ ) काढणे , या वेळ घालवणार्या कामापासून सुट्टी देणे , हा उद्देश असणे महत्त्वाचे आहे...



12) कॅरेट * च महत्व या business मध्ये खूप आहे , कारण , ग्राहकांच्या हातात 2 तास आधी काढलेली ताजी , ऑरगॅनिक , आणि गावरान भाजी जी सुंदर ब्रँडिंग आणि स्वछते सोबत एक कॅरेट मध्ये येत असेल तर , आणखी शोभा आणि आपल्याला ते  डिलिव्हरी देण्यास सोपं जाईल ..


     

           वेळोवेळी मशागती साठी लहान रोटर असणे गरजेचे आहे..ग्राहकांना आम्ही chemical खत वापरत नाही ,फक्त कंपोस्ट , शेणखत , organic खते वापरतो हा विश्वास देणे , social मीडिया वर वेळोवेळी watsapp , facebook , instagram वर विडिओ टाकून मार्केटिंग करणे सहज शक्य आहे..
(त्यामुळे मी सुरुवातीला social मीडिया मार्केटिंग चा उल्लेख केला आहे...)

                 होम डिलिव्हरी देण्याच्या अगोदर जुन्या ग्राहकांशी phone वरून चर्चा करून" अभिप्राय "आणि prebooking केलं तर , अधिकचा डिस्काउंट देने हे या धंद्यातील पॉझिटिव्ह बाजू असेल..

                   हाच business का ???यशस्वी होणार ??

असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे...याची कारणे :-

1) chemical खतांच्या वाढलेला वापरामुळे orgainc खता चे कळलेलं महत्व..
2) गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी नवीन तयार झालेला , सुशिक्षित आणि पैसा असणारा नवीन वर्ग .
3) गावरान बियानांचा वापर ,(Quality over Quantity )
4)ताज्या भाज्या 2 तासाच्या आत ग्राहकांच्या जवळ गेल्यामुळे (customer loyalty वाढणे , सहज शक्य आहे )
5)चांगल्या ब्रँडिंग ,स्वछता, मूळ गृहिणींना कामातून सुट्टी
6) शेतकरी ते ग्राहक यामुळे शेतकऱ्यांचा फायदा .. .
आर्थिक नियोजन आणि अंदाजे मिळणारा पैसा.

1)1 कॅरेट चे गणित , वांगी अर्धा किलो = 30 , कोथिंबीर 2जुडी = 25 रुपये , पालक =12 रुपये , मिरची =60 रुपये अर्धा किलो , 
भेंडी =40 रुपये अर्धा किलो , मेथी 15= रुपये जुडी, शेपू =15 रुपये जुडी , दोडका 3 नग =30 रुपये , टोमॅटो 20 रुपये अर्धा किलो ..बटाटा एक केली 25-30 रुपये (बाजारातुन घेऊन येऊन स्वच्छ धुऊन विकणे ) असे एकूण सुरुवातीला 100 कॅरेट = 200 ×100 = 20000 एक वर्षानंतर 200 कॅरेट सहज शक्य आहे ..


ह्या सोबत च तूप , दूध, दही, फळे, गावरान अंडी, मासे , गावरान कोंबडी विकणे social मीडिया मुळे सहज शक्य आहे...

ह्या गोष्टी टाळा शेतकऱ्यांनी टाळाव्यात !

1) गावातच हा धंदा सुरू करणे !
2) उधारीवर भाज्या देने !
3) इतर व्यापाऱ्यांकडून भाज्याघेऊन विकणे (बटाटा सोडून, कांदा , लसूण , आले सोडून)
4)ग्राहकांच्या कडून सतत अभिप्राय न घेणे !
5) खराब भाज्या पैश्याच्या अमिशापोटी ग्राहकांना देने!
6) स्वच्छते कडे का

नाडोळा करणे !
7) उशिरा डिलिव्हरी देने !

      



               

Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...