Skip to main content

एक एकरात हा धंदा करून कमवा 50000 महिना !

आज शेतकऱ्यांची पोर संभ्रमाच्या अवस्थेत आहेत शेतीला भाव नाही ! नोकरी नाही ! कराव तर काय करावं ! हा मोठा गहन प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर आहे...यासाठी पर्याय आणि शेतीचे भविष्य पाहून मी a
 हा" business plan " शोधला आहे ..

                   यासाठी आपल्याला
1) 1 एकर सुपीक जमीन , 
2) ठिबक सिंचन , 
3) 200 कॅरेट
4) किमान 10 गुंठामध्ये polyhouse , सुरुवातीच्या एक वर्षात नसेल  तरी चालेल, पण दुसऱ्या वर्षापासुन हवाच ..
5) social media instagram, facebook ,email marketing  करता याव! 
6)लहान रोटावेटर..
7) छोटा हत्ती टेम्पो 
8) शेणखत / कोंबडीखात/ लेंडीखात 
9) काही पिकांसाठी कुंड्या किंवा प्लॅस्टिक कुंड्या लागतील.
10) गावरान बी (देशी बियाणे )

1) सुरुवातीला एकर क्षेत्रावर नांगरणी , करून 3 टायली शेणखत टाकून घ्यावा ...
2) नंतर , 1 एकर (म्हणजे 40 गुंठे ) या सर्वांचे 9×5 गुंठे = बरोबर 45 गुंठे याप्रमाणे 9 भाग पाडावे ...
3) त्यानंतर कोथींबीर , शेपू , वांगी ,दोडका , कांदा ,
 मिरची  ,पालक , मेथी , भेंडी , आणि गवार 
4) या 9 पालेभाज्या आणि फळभाजी यांची अशाप्रकारे लागवड करून घ्यावी ,जेणेकरून 200 कुटुंबांना पुरेल अशाप्रकारे सऱ्या काढून घ्याव्यात..
5)एक एकर जास्ती असेल तर कांदा आणि काही प्रमाणात लसूण करून साठवण करून ठेवला तर दुधात साखर .

6) या नऊ भाज्या आणि बाजारातून उपलब्ध असणाऱ्या भाज्या (ताज्या) असणं खूप महत्त्वाचं आहे..
7) तुमच्या भागात होत असणाऱ्या आठवडी बाजाराच्या 2-3  दिवस आधी , social media वर विडिओ किंवा पोस्ट करणे गरजेचे आहे..
8) कारण ह्या business मध्ये (ताजेपणा ) आणि घरपोच सेवा हाच वेगळेपना आहे..
9) सर्वात आधी माझा सल्ला असेल की , स्वतःच्या गावात शक्यतो हा धंदा करू नका ..कारण उधारी होण्याची शक्यता जास्त आहे..
10 ) आणि शेवटी सकाळी लवकर उठून( 5 वाजता) सर्व भाज्या तोडून व्यवस्थित पाण्याने स्वछता करून..(कोथिंबीर )सारख्या भाज्या धुऊन त्यांचे टेठ कापून केळीच्या किंवा कापडाने बांधून ग्राहकाच्या घरी ह्या सर्व भाज्या 2 तासाच्या आत काढल्या पासून पोहचवणे गरजेचे आहे..म्हणजे सकाळी 7 -8 च्या (दरम्यान).
11) सुंदर पॅकिंग , branding , आणि गृहिणींना जास्तीच्या भाज्या स्वच्छ करणे , गहाण बाजूला काढणे , (देठ ) काढणे , या वेळ घालवणार्या कामापासून सुट्टी देणे , हा उद्देश असणे महत्त्वाचे आहे...



12) कॅरेट * च महत्व या business मध्ये खूप आहे , कारण , ग्राहकांच्या हातात 2 तास आधी काढलेली ताजी , ऑरगॅनिक , आणि गावरान भाजी जी सुंदर ब्रँडिंग आणि स्वछते सोबत एक कॅरेट मध्ये येत असेल तर , आणखी शोभा आणि आपल्याला ते  डिलिव्हरी देण्यास सोपं जाईल ..


     

           वेळोवेळी मशागती साठी लहान रोटर असणे गरजेचे आहे..ग्राहकांना आम्ही chemical खत वापरत नाही ,फक्त कंपोस्ट , शेणखत , organic खते वापरतो हा विश्वास देणे , social मीडिया वर वेळोवेळी watsapp , facebook , instagram वर विडिओ टाकून मार्केटिंग करणे सहज शक्य आहे..
(त्यामुळे मी सुरुवातीला social मीडिया मार्केटिंग चा उल्लेख केला आहे...)

                 होम डिलिव्हरी देण्याच्या अगोदर जुन्या ग्राहकांशी phone वरून चर्चा करून" अभिप्राय "आणि prebooking केलं तर , अधिकचा डिस्काउंट देने हे या धंद्यातील पॉझिटिव्ह बाजू असेल..

                   हाच business का ???यशस्वी होणार ??

असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे...याची कारणे :-

1) chemical खतांच्या वाढलेला वापरामुळे orgainc खता चे कळलेलं महत्व..
2) गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी नवीन तयार झालेला , सुशिक्षित आणि पैसा असणारा नवीन वर्ग .
3) गावरान बियानांचा वापर ,(Quality over Quantity )
4)ताज्या भाज्या 2 तासाच्या आत ग्राहकांच्या जवळ गेल्यामुळे (customer loyalty वाढणे , सहज शक्य आहे )
5)चांगल्या ब्रँडिंग ,स्वछता, मूळ गृहिणींना कामातून सुट्टी
6) शेतकरी ते ग्राहक यामुळे शेतकऱ्यांचा फायदा .. .
आर्थिक नियोजन आणि अंदाजे मिळणारा पैसा.

1)1 कॅरेट चे गणित , वांगी अर्धा किलो = 30 , कोथिंबीर 2जुडी = 25 रुपये , पालक =12 रुपये , मिरची =60 रुपये अर्धा किलो , 
भेंडी =40 रुपये अर्धा किलो , मेथी 15= रुपये जुडी, शेपू =15 रुपये जुडी , दोडका 3 नग =30 रुपये , टोमॅटो 20 रुपये अर्धा किलो ..बटाटा एक केली 25-30 रुपये (बाजारातुन घेऊन येऊन स्वच्छ धुऊन विकणे ) असे एकूण सुरुवातीला 100 कॅरेट = 200 ×100 = 20000 एक वर्षानंतर 200 कॅरेट सहज शक्य आहे ..


ह्या सोबत च तूप , दूध, दही, फळे, गावरान अंडी, मासे , गावरान कोंबडी विकणे social मीडिया मुळे सहज शक्य आहे...

ह्या गोष्टी टाळा शेतकऱ्यांनी टाळाव्यात !

1) गावातच हा धंदा सुरू करणे !
2) उधारीवर भाज्या देने !
3) इतर व्यापाऱ्यांकडून भाज्याघेऊन विकणे (बटाटा सोडून, कांदा , लसूण , आले सोडून)
4)ग्राहकांच्या कडून सतत अभिप्राय न घेणे !
5) खराब भाज्या पैश्याच्या अमिशापोटी ग्राहकांना देने!
6) स्वच्छते कडे का

नाडोळा करणे !
7) उशिरा डिलिव्हरी देने !

      



               

Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...