Skip to main content

शेतकऱ्यांची पोर ऑपशन ट्रेडिंग च्या विळख्यात ? आणि वास्तव ?

Option trading ! Option trading ! आणि option ट्रेडिंग !

2019 नंतर जसा कोरोना ची देशात साथ आली तशी अजून एक साथ भारतात आली ती साथ म्हणजे option trading ची..

ही साथ येण्यामागे प्रमुख 3 कारणे होती :
१) बिनकामाची तरुणाई .
2) 1992 scam webseries  .
3) influencer चा भरणा .

मुळात हा रोगाची चर्चा मुख्य माध्यमातून झाली नाही त्यामुळे , manipulation खूप प्रमाणात झाले.. आणि ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणाई याला बळी पडली...
                याची सुरुवात होते watsapp आणि telegram ग्रुप वर हजारो रुपयांची प्रोफीटचे स्क्रीनशॉट पाहून ,माझी सुद्धा काही वेगळी परिस्थिती


न्हवती..2021 चा नोव्हेंबर महिना ,जवळच्या मित्राने मला काही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवले , त्याला traders '' टेलिग्राम कॉल्स '' अस म्हणतात ..म्हणजे टेलिग्राम च्या अडमिन ने ''call ''(म्हणजे मार्केट वाढेल )
'' PUT '' ( म्हणजे मार्केट पडेल ) अशा त्या शक्यता ग्रुप मध्ये  ''कॉल्स ' दिले जातात आणि आपल्याला त्या कॉल नुसार लगेच ते buy आणि sell करावे लागतात ...
सुरुवातीचे 3 दिवस 2000 ,1500, 1200 असा सलग तीन दिवस मला अगदी काही मिनिटांमध्ये प्रॉफिट झाला ..मला वाटल की आता काही दिवसात मी करोडपती होतो की काय !

पण मला पुढं येणाऱ्या काळ्या संकटाबाबत काहीच कल्पना न्हवती ..पण माझ्या नशिबाने त्या वेळेस माझे वय फक्त 18 वर्ष असल्याने माझ्याकडे खूप कमी पैसे होते म्हणजे अगदीच 10000-12000 त्यामुळे थोडक्यात वाचलो..४थ्या दिवशी 5000 रुपये लॉस पण , मला वाईट वाटलं नाही कारण , हे पैसे माज्यास्वतःचे न्हवते मार्केट मधून कमावलेलं मार्केट ला गेले अशी ती माझी समजूत..

             सुरुवातीच्या ह्या 3 चुका मीही केल्या ,
 १) stoploss  न लावणे 'मुळात मला stoploss म्हणजे काय हेच माहिती न्हवत .
२) ट्रेड वर loss मधून प्रॉफिट मध्ये येईल ह्या आशेवर तासन्तास थांबणं..यामुळे'' थिटा '' decay म्हणजे काय ? याची मला कल्पना नव्हती ! 
३) ट्रेड पुढच्या दिवसात घेऊन जाण ! ज्याला आपण carry forward म्हणतो !

                अस करत करत आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा माज्या अकाउंट मध्ये असणारे 10000 पैकी 8000रुपये  एका ट्रेड म्हणजे अगदी 5 मिनटाध्ये संपले , मी ते पैसे 2-3 महिने मजुरी करून कमावले होते...अगदी डोळ्यात पाणी आलं '' पण मी हार मानली नाही मी एक जॉब पहिला अगदी 9000 रुपये पगार वाला ठरवलं 5 महिने sharemarket शिकू आणि 40-45 हजारपासून सुरुवात करू..

                 प्लॅन चांगला होता ,पण मला याची कल्पना न्हवती की , मी ह्या मायाजाळा मध्ये हळूहळू अडकत चाललोय , Sharemarket मध्ये सुरुवात ही 


1)काही share घेऊन मार्केट च्या वेगाबद्दल कल्पना घेऊन (fluctuation ) समजून घेणे महत्वाचे आहे ..
(2-3 महिने)
2) नंतर mutual fund किंवा ETF ( exchange traded fund ) पासून ट्रेडिंग ला सुरुवात करणं गरजेचं आहे ..( 4-5 महिने )
3) (यानंतर swing ट्रेडिंग shares मध्ये करून पाहन आणि profittable राहणं महत्वाचं आहे )
(5-6 महिने ).
4) हा टप्प्यानंतर share trading , सुरुवातीला अगदी लहान लहान लॉट घेऊन , म्हणजे 1000 रुपयांपासून सुरुवात करून 100000 रूपामध्ये करून सलग 5-6 महिने profitable राहणं गरजेचं आहे..(10-12 महिने)
5) आणि हा 2 वर्षांचा टप्पा पार करून option selling मध्ये किंवा buying मध्ये येन तरुणांकडून अपेक्षित असत .
                     पण , मी हा 2 वर्षाचा टप्पा पार न करता सरळ 5व्या टप्यात मध्ये ऑपशन ट्रेडिंग मध्ये आलो आहे याची कल्पना मला 1 वर्षानंतर आली..😢

                      5 महिने जॉब केल्यानंतर आणि हातात 40000 आल्यानंतर मी परत ऑपशन  ट्रेडिंग करायला सुरुवात केली , आणि ठरवलं 200 रुपयाचा stoploss , किंवा 200 रुपयांचा profit ह्यापैकी एक भेटलं तर ट्रेड मधून बाहेर निघायचं ! अस मी ghanshaym trade ज्याला आपण (art of trading) ह्या चॅनेल वरून मी psycology बद्दल शिकलो...आणि हळूहळू मला कळायला लागलं की ट्रेडिंग ही
 (50% psycology 50% disipline ) ह्यावर अवलंबून आहे..हे कळल्यानंतर मी त्यावर 3-4 महिने काम केलं ...आणि मी सलग 2 महिने profitable झालो सुद्धा  ,पण परत तोच psycology चा प्रॉब्लेम झाला मला वाटलं आता मी ट्रेडर झालोच पण मला हे माहीतच न्हवत की ,
8) कारण मार्केट 20 दिवस चालू असते , 15 दिवस जरी लॉस झाला तरी , जर आपण 1: 10 , 1:12  असे


1) ट्रेडिंग मध्ये सलग 1 -2 वर्ष profitable झाल्याशिवाय ट्रेडर झालो अस म्हणता ,येनार नाही 
आणि तो overconfidance मुळे 2 महिन्यात मिळवलेले 10 हजार एक महिन्यात 7 हजारच लॉस होऊन माझा चांगला झटका बसला ..
2) अति ट्रेडिंग करणे मला नंतर महागात पडलं कारण , hope trading  ,fomo , overconfidence मला महागात पडला .
3) पण ,एक गोष्ट मी या पहिल्या 1 वर्षा मध्ये शिकलो होतो ती म्हणजे ,लहान लॉट घेणे ,स्टॉप लॉस , आणि जास्ती ट्रेडिंग न करणे , स्थिर मार्केट मध्ये ट्रेड न घेणे, youtube , telegram न बघता स्वतःचा सेटअप आल्यानंतर च ट्रेड घेणे , ट्रेड घेतल्यानंतर थांबणे...
४) पण , मार्केट येथे संपत नाही, सलग 3-4 दिवस लॉस घेतल्यानंतर आपली मानसिकता , फक्त पैसे मिळवणे यावरच केंद्रित झाली ..
5) मी टार्गेट कडे लक्ष द्यायला बंद करून फक्त पैसा मिळवणे ह्यावर लक्ष दिले..
6) trailing stop loss ही गोष्ट मला शिकता आली नाही..
7) 1:2 1:3 जास्तीत जास्त 1:4  ह्यावरच समाधानी होतो पण ट्रेडिंग मध्ये 1:10 , 1:15 अशे टार्गेट मिळवणे हीच खरी गुरुकिल्ली आहे.. टार्गेट 2 दिवस घेऊ शकलो तरच , आपण trading मध्ये लांबच्या टप्यात टिकाव धरू शकतो..हीच खरी ट्रेडिंग ची गुरुकिल्ली..
9) मोठे टार्गेट मिळवणे हेच trading चे खरे आव्हान आहे , आणि त्यात मी निभाव धरू शकलो नाही..
10) आणि जवळ जवळ सगळे मिळून 25000 रुपये गेले , आज मला याचे वाईट वाटत नाही ,कारण मी ह्यातून खूप शिकलो , आणि नंतर मी etf ट्रेडिंग मधून कमावले .सुद्धा .

                    पण माझा खरा मुद्दा आहे , की यातून बाहेर कस  निघायच कारण  ''सट्टा '' आणि 'ट्रेडिंग ' हे एकच आहे , कारण ही एक नशा आहे , तुम्हांला बाहेर निघण्यासाठी खूप धैर्याने प्रयत्न करावे लागतात ,शेवटी मी तो निर्णय दीड वर्षानंतर घेतला , option ट्रेडिंग बंद..
                    सुरुवातीला वाईट वाटलं , जीव कासावीस झाला पण , मी हार मानली नाही आणि ह्या मायाजाल मधून मी बाहेर आलो ..


पण माझे काही प्रश्न आहेत जे मला कायम भिती वाटते 
1) जर माझ्याकडे खूप पैसे असते तर ?
2) 250000 च्या जागेवर 2500000 असते तर ?
3) मी बाहेर निघालो असतो का की गाळाप्रमाणे फसत गेलो असतो.
4) मला dipression आले असते का ?
5) याचा घरी परिणाम झाला असता का ?
6) अनेक लोकांनी फाशी घेण्याचा निर्णय घेतला तसा मी घेतला असता का ?

                      शेवटी माझा सल्ला हाच असेल की option trading हे middle class लोकांसाठी मुळीच नाही , 
ह्याची अनेक उदाहरण राकेश झुणझुणवाला , अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः सांगितलं आहे की '' option trading is not made for middle class people '' तुम्ही त्यांच्या वर टीका करा शिव्या द्या , पण देशाचा अर्थमंत्री अस का बोलला असेल याची जाणीव ठेवा ..
Zerodha चे मालक निखिल कामात यांनी सांगितले आहे की , option trading मध्ये 98 % लोकांचा पैसे बुडालेले आहेत..
 

काही लोकांना हे पटणार नाही , ते मला येड्यात काढतील पण शब्द आहे माझा वेळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की शिकवेल👍


Thank you for reading my blog 





                

                      
 

Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...