Skip to main content

शेतकऱ्यांची पोर ऑपशन ट्रेडिंग च्या विळख्यात ? आणि वास्तव ?

Option trading ! Option trading ! आणि option ट्रेडिंग !

2019 नंतर जसा कोरोना ची देशात साथ आली तशी अजून एक साथ भारतात आली ती साथ म्हणजे option trading ची..

ही साथ येण्यामागे प्रमुख 3 कारणे होती :
१) बिनकामाची तरुणाई .
2) 1992 scam webseries  .
3) influencer चा भरणा .

मुळात हा रोगाची चर्चा मुख्य माध्यमातून झाली नाही त्यामुळे , manipulation खूप प्रमाणात झाले.. आणि ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणाई याला बळी पडली...
                याची सुरुवात होते watsapp आणि telegram ग्रुप वर हजारो रुपयांची प्रोफीटचे स्क्रीनशॉट पाहून ,माझी सुद्धा काही वेगळी परिस्थिती


न्हवती..2021 चा नोव्हेंबर महिना ,जवळच्या मित्राने मला काही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवले , त्याला traders '' टेलिग्राम कॉल्स '' अस म्हणतात ..म्हणजे टेलिग्राम च्या अडमिन ने ''call ''(म्हणजे मार्केट वाढेल )
'' PUT '' ( म्हणजे मार्केट पडेल ) अशा त्या शक्यता ग्रुप मध्ये  ''कॉल्स ' दिले जातात आणि आपल्याला त्या कॉल नुसार लगेच ते buy आणि sell करावे लागतात ...
सुरुवातीचे 3 दिवस 2000 ,1500, 1200 असा सलग तीन दिवस मला अगदी काही मिनिटांमध्ये प्रॉफिट झाला ..मला वाटल की आता काही दिवसात मी करोडपती होतो की काय !

पण मला पुढं येणाऱ्या काळ्या संकटाबाबत काहीच कल्पना न्हवती ..पण माझ्या नशिबाने त्या वेळेस माझे वय फक्त 18 वर्ष असल्याने माझ्याकडे खूप कमी पैसे होते म्हणजे अगदीच 10000-12000 त्यामुळे थोडक्यात वाचलो..४थ्या दिवशी 5000 रुपये लॉस पण , मला वाईट वाटलं नाही कारण , हे पैसे माज्यास्वतःचे न्हवते मार्केट मधून कमावलेलं मार्केट ला गेले अशी ती माझी समजूत..

             सुरुवातीच्या ह्या 3 चुका मीही केल्या ,
 १) stoploss  न लावणे 'मुळात मला stoploss म्हणजे काय हेच माहिती न्हवत .
२) ट्रेड वर loss मधून प्रॉफिट मध्ये येईल ह्या आशेवर तासन्तास थांबणं..यामुळे'' थिटा '' decay म्हणजे काय ? याची मला कल्पना नव्हती ! 
३) ट्रेड पुढच्या दिवसात घेऊन जाण ! ज्याला आपण carry forward म्हणतो !

                अस करत करत आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा माज्या अकाउंट मध्ये असणारे 10000 पैकी 8000रुपये  एका ट्रेड म्हणजे अगदी 5 मिनटाध्ये संपले , मी ते पैसे 2-3 महिने मजुरी करून कमावले होते...अगदी डोळ्यात पाणी आलं '' पण मी हार मानली नाही मी एक जॉब पहिला अगदी 9000 रुपये पगार वाला ठरवलं 5 महिने sharemarket शिकू आणि 40-45 हजारपासून सुरुवात करू..

                 प्लॅन चांगला होता ,पण मला याची कल्पना न्हवती की , मी ह्या मायाजाळा मध्ये हळूहळू अडकत चाललोय , Sharemarket मध्ये सुरुवात ही 


1)काही share घेऊन मार्केट च्या वेगाबद्दल कल्पना घेऊन (fluctuation ) समजून घेणे महत्वाचे आहे ..
(2-3 महिने)
2) नंतर mutual fund किंवा ETF ( exchange traded fund ) पासून ट्रेडिंग ला सुरुवात करणं गरजेचं आहे ..( 4-5 महिने )
3) (यानंतर swing ट्रेडिंग shares मध्ये करून पाहन आणि profittable राहणं महत्वाचं आहे )
(5-6 महिने ).
4) हा टप्प्यानंतर share trading , सुरुवातीला अगदी लहान लहान लॉट घेऊन , म्हणजे 1000 रुपयांपासून सुरुवात करून 100000 रूपामध्ये करून सलग 5-6 महिने profitable राहणं गरजेचं आहे..(10-12 महिने)
5) आणि हा 2 वर्षांचा टप्पा पार करून option selling मध्ये किंवा buying मध्ये येन तरुणांकडून अपेक्षित असत .
                     पण , मी हा 2 वर्षाचा टप्पा पार न करता सरळ 5व्या टप्यात मध्ये ऑपशन ट्रेडिंग मध्ये आलो आहे याची कल्पना मला 1 वर्षानंतर आली..😢

                      5 महिने जॉब केल्यानंतर आणि हातात 40000 आल्यानंतर मी परत ऑपशन  ट्रेडिंग करायला सुरुवात केली , आणि ठरवलं 200 रुपयाचा stoploss , किंवा 200 रुपयांचा profit ह्यापैकी एक भेटलं तर ट्रेड मधून बाहेर निघायचं ! अस मी ghanshaym trade ज्याला आपण (art of trading) ह्या चॅनेल वरून मी psycology बद्दल शिकलो...आणि हळूहळू मला कळायला लागलं की ट्रेडिंग ही
 (50% psycology 50% disipline ) ह्यावर अवलंबून आहे..हे कळल्यानंतर मी त्यावर 3-4 महिने काम केलं ...आणि मी सलग 2 महिने profitable झालो सुद्धा  ,पण परत तोच psycology चा प्रॉब्लेम झाला मला वाटलं आता मी ट्रेडर झालोच पण मला हे माहीतच न्हवत की ,
8) कारण मार्केट 20 दिवस चालू असते , 15 दिवस जरी लॉस झाला तरी , जर आपण 1: 10 , 1:12  असे


1) ट्रेडिंग मध्ये सलग 1 -2 वर्ष profitable झाल्याशिवाय ट्रेडर झालो अस म्हणता ,येनार नाही 
आणि तो overconfidance मुळे 2 महिन्यात मिळवलेले 10 हजार एक महिन्यात 7 हजारच लॉस होऊन माझा चांगला झटका बसला ..
2) अति ट्रेडिंग करणे मला नंतर महागात पडलं कारण , hope trading  ,fomo , overconfidence मला महागात पडला .
3) पण ,एक गोष्ट मी या पहिल्या 1 वर्षा मध्ये शिकलो होतो ती म्हणजे ,लहान लॉट घेणे ,स्टॉप लॉस , आणि जास्ती ट्रेडिंग न करणे , स्थिर मार्केट मध्ये ट्रेड न घेणे, youtube , telegram न बघता स्वतःचा सेटअप आल्यानंतर च ट्रेड घेणे , ट्रेड घेतल्यानंतर थांबणे...
४) पण , मार्केट येथे संपत नाही, सलग 3-4 दिवस लॉस घेतल्यानंतर आपली मानसिकता , फक्त पैसे मिळवणे यावरच केंद्रित झाली ..
5) मी टार्गेट कडे लक्ष द्यायला बंद करून फक्त पैसा मिळवणे ह्यावर लक्ष दिले..
6) trailing stop loss ही गोष्ट मला शिकता आली नाही..
7) 1:2 1:3 जास्तीत जास्त 1:4  ह्यावरच समाधानी होतो पण ट्रेडिंग मध्ये 1:10 , 1:15 अशे टार्गेट मिळवणे हीच खरी गुरुकिल्ली आहे.. टार्गेट 2 दिवस घेऊ शकलो तरच , आपण trading मध्ये लांबच्या टप्यात टिकाव धरू शकतो..हीच खरी ट्रेडिंग ची गुरुकिल्ली..
9) मोठे टार्गेट मिळवणे हेच trading चे खरे आव्हान आहे , आणि त्यात मी निभाव धरू शकलो नाही..
10) आणि जवळ जवळ सगळे मिळून 25000 रुपये गेले , आज मला याचे वाईट वाटत नाही ,कारण मी ह्यातून खूप शिकलो , आणि नंतर मी etf ट्रेडिंग मधून कमावले .सुद्धा .

                    पण माझा खरा मुद्दा आहे , की यातून बाहेर कस  निघायच कारण  ''सट्टा '' आणि 'ट्रेडिंग ' हे एकच आहे , कारण ही एक नशा आहे , तुम्हांला बाहेर निघण्यासाठी खूप धैर्याने प्रयत्न करावे लागतात ,शेवटी मी तो निर्णय दीड वर्षानंतर घेतला , option ट्रेडिंग बंद..
                    सुरुवातीला वाईट वाटलं , जीव कासावीस झाला पण , मी हार मानली नाही आणि ह्या मायाजाल मधून मी बाहेर आलो ..


पण माझे काही प्रश्न आहेत जे मला कायम भिती वाटते 
1) जर माझ्याकडे खूप पैसे असते तर ?
2) 250000 च्या जागेवर 2500000 असते तर ?
3) मी बाहेर निघालो असतो का की गाळाप्रमाणे फसत गेलो असतो.
4) मला dipression आले असते का ?
5) याचा घरी परिणाम झाला असता का ?
6) अनेक लोकांनी फाशी घेण्याचा निर्णय घेतला तसा मी घेतला असता का ?

                      शेवटी माझा सल्ला हाच असेल की option trading हे middle class लोकांसाठी मुळीच नाही , 
ह्याची अनेक उदाहरण राकेश झुणझुणवाला , अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः सांगितलं आहे की '' option trading is not made for middle class people '' तुम्ही त्यांच्या वर टीका करा शिव्या द्या , पण देशाचा अर्थमंत्री अस का बोलला असेल याची जाणीव ठेवा ..
Zerodha चे मालक निखिल कामात यांनी सांगितले आहे की , option trading मध्ये 98 % लोकांचा पैसे बुडालेले आहेत..
 

काही लोकांना हे पटणार नाही , ते मला येड्यात काढतील पण शब्द आहे माझा वेळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की शिकवेल👍


Thank you for reading my blog 





                

                      
 

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...