Skip to main content

गावातून शहरात नोकरी निमित्त गेलेल्या मुलांची अवस्था ? आणि शेतकरी नवरा नको ग बाई !

शेतकरी नवरा नको गं बाई ! म्हणणाऱ्या मुली आणि त्यांचे आई वडील आज मोठ्या तोऱ्याने  सांगतात " आम्हाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको...
पण , त्याच्या आधी खरी परिस्थिती जाणून तर घ्या !

       मुलीच्या आई बापाला नोकरी म्हणजे पैसा , सुख , समाधान ,ऐश्वर्य , हे वाटत असत , खरी परिस्थिती नोकरी करणाऱ्या पोरांनाच माहिती असते , .मुळात पुणे -मुंबई सारख्या ठिकाणि नोकऱ्या करणाऱ्या पोरांचं आयुष्य हे मेंढरा च्या सारख आहे..सकाळी 8 वाजता घरून निघा , कारण ट्रॅफिक 9.30 ते 7 पर्यंत काम करा आणि रात्री 8 वाजता घरी या , 2 तास बसा ,झोपा , आणि परत तेच .
                    ना कोणते सण साजरे करता येतात , ना कोणते समारंभ ,आई -वडील , चुलते , पाहुणे , भाऊ यांच्या पासून लांब , जे काही असेल तर रविवारी , पुण्यासारख्या ठिकाणी जो मुलगा 30-40000 कमावतो त्याच्या हातात महिन्याच्या अखेरीस 5000 पण शिल्लक राहत नाही..10000 भाडं + 5000 किराणा + 5000 येजा + 5000 light bill , tv bill ,mobile bill ,फिरणे , हॉटेल , + त्याच अचानक emergency आली तर ,विषय संपला .. जेव्हा पगार 60000 -70000 होईल तेव्हा नोकरदारांची आयुष्यभराची कमाई 2bhk flat , 10 लाखाची गाडी ,मुलांची शिक्षण ,ह्यायच संपून जाते.."

EMI वरच सगळी जिंदगी " असा माझा एक मित्र कायम आम्हाला चिडवत असतो.

       

         शेतकरी मुलगा ,छान घर , एकुलता एक असेन तर , 4-5 एकर बागायती जमीन ,किंवा जिरायती असेल तर ,धंदा असावा तो मुलगा शहरातल्या 50000 वाल्या नोकर दारांना कधीही भारी..कारण आई-वडील सांभाळून , सण - समारंभ कुटुंबासोबत साजरे करता येतात , कमी प्रदूषण , शुद्ध पाणी, मित्र-नातेवाईकांचा सहवास , 

                   माझ्या मामाने सांगितलं होतं तू नोकरी निवडली तर , तू 10 वर्ष आयुष्य कमी जगणार , कारण तुला जेवण शुद्ध मिळणार नाही , दूध सुद्धा तू भेसळयुक्त पिणार ,पाणी सुद्धा कॉर्पोरेशन च chemical टाकलेलं पिणार , कॉम्प्युटर मुळे डोळे आणि कंबर जाणार ,तू जेव्हा retire होशील तेव्हा तुज्या जवळ पैसे असेलही ,पण शरीर निरोगी नसेल आणि जिवाभावाची मित्र आणि नातेवाईक तू कमवू शकणार नाही

                      आज शहरातल्या मुलांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्राचा  , कारण कॉर्पोरेट मध्ये दर 2-3 वर्षाला जॉब बदलावा लागतो , दर 2 वर्षांनी नवीन मित्रांमुळे जीवाला जीव देणारे मित्र बनवता येत नाही , काही मनातलं असेल तर मन मोकळं करता येत नाही , या सगळ्यामूळ anxiety आणि depression मोठ्या प्रमाणात शहरात वाढलेले दिसत आहे...

                       '' काटकपणा '' नावाची गोष्ट आज ना तरुणांमध्ये राहिली आहे ना त्यांच्या लहान मुलांमध्ये , obesity आणि चष्मा लागणे हे आजार आज मुले -आणि मुली यांच्या मध्ये सहज दिसतात ..
                         नोकऱ्या करणाऱ्या लोकांच्या मुलांना भावकी, नातेवाईक, सण , वार , या गोष्टीचा विसर पडलेला असतो , "individualism " हाच त्यांचा दागिना असतो, " पाहुणचार " म्हणजे काय? आशा संकल्पना त्यांच्या dictionary मध्ये नसतात ...थोडक्यात

 'bad time crate strong people'
Good time crate weak people '

या म्हणी प्रमाणे ,दुर्बल पिढी शहरात घडवली जात आहे ..ह्या पिढीचा , संस्कृती , परंपरा , धर्म, देव , भावकी , नातेवाईक ,शेती , कुलदैवत ,आजी -आजोबा  या सगळ्या गोष्टींपासून फारकत घेऊन फक्त मी आणि माझे 'पपा मम्मी , तेच काय ते त्यांचं जग बनलेलं असत..
                  आज मी सुद्धा पुण्यात शिक्षण घेतोय  , आज ना उद्या नोकरी भेटेल , पण कायम स्वरूपी शहरात राहुन अस आपण नक्की काय मिळवणार आहोत , जे आपल्याला गावात भेटत न्हवत ? हा प्रश्न कायम माझ्या मनात घर करून राहतो ...
                      माझ्या पुढच्या पिढीसाठी गावाला आणि शहराला मी रोज वेगळ्या वेगळ्या मापाने तोलत असतो...

आतापर्यंत तरी गावाच पारड आई -वडील , शेती , नातेवाईक , चुलते , सण , समारंभ , देव , हवा, जेवण, मानसिक आधार , समाधाना, मुळे एकबाजूला झुकलेले आहे...


शेवटी गड्या आपलं गावच बर !

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...