Skip to main content

गावातून शहरात नोकरी निमित्त गेलेल्या मुलांची अवस्था ? आणि शेतकरी नवरा नको ग बाई !

शेतकरी नवरा नको गं बाई ! म्हणणाऱ्या मुली आणि त्यांचे आई वडील आज मोठ्या तोऱ्याने  सांगतात " आम्हाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको...
पण , त्याच्या आधी खरी परिस्थिती जाणून तर घ्या !

       मुलीच्या आई बापाला नोकरी म्हणजे पैसा , सुख , समाधान ,ऐश्वर्य , हे वाटत असत , खरी परिस्थिती नोकरी करणाऱ्या पोरांनाच माहिती असते , .मुळात पुणे -मुंबई सारख्या ठिकाणि नोकऱ्या करणाऱ्या पोरांचं आयुष्य हे मेंढरा च्या सारख आहे..सकाळी 8 वाजता घरून निघा , कारण ट्रॅफिक 9.30 ते 7 पर्यंत काम करा आणि रात्री 8 वाजता घरी या , 2 तास बसा ,झोपा , आणि परत तेच .
                    ना कोणते सण साजरे करता येतात , ना कोणते समारंभ ,आई -वडील , चुलते , पाहुणे , भाऊ यांच्या पासून लांब , जे काही असेल तर रविवारी , पुण्यासारख्या ठिकाणी जो मुलगा 30-40000 कमावतो त्याच्या हातात महिन्याच्या अखेरीस 5000 पण शिल्लक राहत नाही..10000 भाडं + 5000 किराणा + 5000 येजा + 5000 light bill , tv bill ,mobile bill ,फिरणे , हॉटेल , + त्याच अचानक emergency आली तर ,विषय संपला .. जेव्हा पगार 60000 -70000 होईल तेव्हा नोकरदारांची आयुष्यभराची कमाई 2bhk flat , 10 लाखाची गाडी ,मुलांची शिक्षण ,ह्यायच संपून जाते.."

EMI वरच सगळी जिंदगी " असा माझा एक मित्र कायम आम्हाला चिडवत असतो.

       

         शेतकरी मुलगा ,छान घर , एकुलता एक असेन तर , 4-5 एकर बागायती जमीन ,किंवा जिरायती असेल तर ,धंदा असावा तो मुलगा शहरातल्या 50000 वाल्या नोकर दारांना कधीही भारी..कारण आई-वडील सांभाळून , सण - समारंभ कुटुंबासोबत साजरे करता येतात , कमी प्रदूषण , शुद्ध पाणी, मित्र-नातेवाईकांचा सहवास , 

                   माझ्या मामाने सांगितलं होतं तू नोकरी निवडली तर , तू 10 वर्ष आयुष्य कमी जगणार , कारण तुला जेवण शुद्ध मिळणार नाही , दूध सुद्धा तू भेसळयुक्त पिणार ,पाणी सुद्धा कॉर्पोरेशन च chemical टाकलेलं पिणार , कॉम्प्युटर मुळे डोळे आणि कंबर जाणार ,तू जेव्हा retire होशील तेव्हा तुज्या जवळ पैसे असेलही ,पण शरीर निरोगी नसेल आणि जिवाभावाची मित्र आणि नातेवाईक तू कमवू शकणार नाही

                      आज शहरातल्या मुलांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्राचा  , कारण कॉर्पोरेट मध्ये दर 2-3 वर्षाला जॉब बदलावा लागतो , दर 2 वर्षांनी नवीन मित्रांमुळे जीवाला जीव देणारे मित्र बनवता येत नाही , काही मनातलं असेल तर मन मोकळं करता येत नाही , या सगळ्यामूळ anxiety आणि depression मोठ्या प्रमाणात शहरात वाढलेले दिसत आहे...

                       '' काटकपणा '' नावाची गोष्ट आज ना तरुणांमध्ये राहिली आहे ना त्यांच्या लहान मुलांमध्ये , obesity आणि चष्मा लागणे हे आजार आज मुले -आणि मुली यांच्या मध्ये सहज दिसतात ..
                         नोकऱ्या करणाऱ्या लोकांच्या मुलांना भावकी, नातेवाईक, सण , वार , या गोष्टीचा विसर पडलेला असतो , "individualism " हाच त्यांचा दागिना असतो, " पाहुणचार " म्हणजे काय? आशा संकल्पना त्यांच्या dictionary मध्ये नसतात ...थोडक्यात

 'bad time crate strong people'
Good time crate weak people '

या म्हणी प्रमाणे ,दुर्बल पिढी शहरात घडवली जात आहे ..ह्या पिढीचा , संस्कृती , परंपरा , धर्म, देव , भावकी , नातेवाईक ,शेती , कुलदैवत ,आजी -आजोबा  या सगळ्या गोष्टींपासून फारकत घेऊन फक्त मी आणि माझे 'पपा मम्मी , तेच काय ते त्यांचं जग बनलेलं असत..
                  आज मी सुद्धा पुण्यात शिक्षण घेतोय  , आज ना उद्या नोकरी भेटेल , पण कायम स्वरूपी शहरात राहुन अस आपण नक्की काय मिळवणार आहोत , जे आपल्याला गावात भेटत न्हवत ? हा प्रश्न कायम माझ्या मनात घर करून राहतो ...
                      माझ्या पुढच्या पिढीसाठी गावाला आणि शहराला मी रोज वेगळ्या वेगळ्या मापाने तोलत असतो...

आतापर्यंत तरी गावाच पारड आई -वडील , शेती , नातेवाईक , चुलते , सण , समारंभ , देव , हवा, जेवण, मानसिक आधार , समाधाना, मुळे एकबाजूला झुकलेले आहे...


शेवटी गड्या आपलं गावच बर !

Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...