शेतकरी नवरा नको गं बाई ! म्हणणाऱ्या मुली आणि त्यांचे आई वडील आज मोठ्या तोऱ्याने सांगतात " आम्हाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको...
पण , त्याच्या आधी खरी परिस्थिती जाणून तर घ्या !
मुलीच्या आई बापाला नोकरी म्हणजे पैसा , सुख , समाधान ,ऐश्वर्य , हे वाटत असत , खरी परिस्थिती नोकरी करणाऱ्या पोरांनाच माहिती असते , .मुळात पुणे -मुंबई सारख्या ठिकाणि नोकऱ्या करणाऱ्या पोरांचं आयुष्य हे मेंढरा च्या सारख आहे..सकाळी 8 वाजता घरून निघा , कारण ट्रॅफिक 9.30 ते 7 पर्यंत काम करा आणि रात्री 8 वाजता घरी या , 2 तास बसा ,झोपा , आणि परत तेच .
ना कोणते सण साजरे करता येतात , ना कोणते समारंभ ,आई -वडील , चुलते , पाहुणे , भाऊ यांच्या पासून लांब , जे काही असेल तर रविवारी , पुण्यासारख्या ठिकाणी जो मुलगा 30-40000 कमावतो त्याच्या हातात महिन्याच्या अखेरीस 5000 पण शिल्लक राहत नाही..10000 भाडं + 5000 किराणा + 5000 येजा + 5000 light bill , tv bill ,mobile bill ,फिरणे , हॉटेल , + त्याच अचानक emergency आली तर ,विषय संपला .. जेव्हा पगार 60000 -70000 होईल तेव्हा नोकरदारांची आयुष्यभराची कमाई 2bhk flat , 10 लाखाची गाडी ,मुलांची शिक्षण ,ह्यायच संपून जाते.."
EMI वरच सगळी जिंदगी " असा माझा एक मित्र कायम आम्हाला चिडवत असतो.
शेतकरी मुलगा ,छान घर , एकुलता एक असेन तर , 4-5 एकर बागायती जमीन ,किंवा जिरायती असेल तर ,धंदा असावा तो मुलगा शहरातल्या 50000 वाल्या नोकर दारांना कधीही भारी..कारण आई-वडील सांभाळून , सण - समारंभ कुटुंबासोबत साजरे करता येतात , कमी प्रदूषण , शुद्ध पाणी, मित्र-नातेवाईकांचा सहवास ,
माझ्या मामाने सांगितलं होतं तू नोकरी निवडली तर , तू 10 वर्ष आयुष्य कमी जगणार , कारण तुला जेवण शुद्ध मिळणार नाही , दूध सुद्धा तू भेसळयुक्त पिणार ,पाणी सुद्धा कॉर्पोरेशन च chemical टाकलेलं पिणार , कॉम्प्युटर मुळे डोळे आणि कंबर जाणार ,तू जेव्हा retire होशील तेव्हा तुज्या जवळ पैसे असेलही ,पण शरीर निरोगी नसेल आणि जिवाभावाची मित्र आणि नातेवाईक तू कमवू शकणार नाही
आज शहरातल्या मुलांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्राचा , कारण कॉर्पोरेट मध्ये दर 2-3 वर्षाला जॉब बदलावा लागतो , दर 2 वर्षांनी नवीन मित्रांमुळे जीवाला जीव देणारे मित्र बनवता येत नाही , काही मनातलं असेल तर मन मोकळं करता येत नाही , या सगळ्यामूळ anxiety आणि depression मोठ्या प्रमाणात शहरात वाढलेले दिसत आहे...
'' काटकपणा '' नावाची गोष्ट आज ना तरुणांमध्ये राहिली आहे ना त्यांच्या लहान मुलांमध्ये , obesity आणि चष्मा लागणे हे आजार आज मुले -आणि मुली यांच्या मध्ये सहज दिसतात ..
नोकऱ्या करणाऱ्या लोकांच्या मुलांना भावकी, नातेवाईक, सण , वार , या गोष्टीचा विसर पडलेला असतो , "individualism " हाच त्यांचा दागिना असतो, " पाहुणचार " म्हणजे काय? आशा संकल्पना त्यांच्या dictionary मध्ये नसतात ...थोडक्यात
'bad time crate strong people'
Good time crate weak people '
या म्हणी प्रमाणे ,दुर्बल पिढी शहरात घडवली जात आहे ..ह्या पिढीचा , संस्कृती , परंपरा , धर्म, देव , भावकी , नातेवाईक ,शेती , कुलदैवत ,आजी -आजोबा या सगळ्या गोष्टींपासून फारकत घेऊन फक्त मी आणि माझे 'पपा मम्मी , तेच काय ते त्यांचं जग बनलेलं असत..
आज मी सुद्धा पुण्यात शिक्षण घेतोय , आज ना उद्या नोकरी भेटेल , पण कायम स्वरूपी शहरात राहुन अस आपण नक्की काय मिळवणार आहोत , जे आपल्याला गावात भेटत न्हवत ? हा प्रश्न कायम माझ्या मनात घर करून राहतो ...
माझ्या पुढच्या पिढीसाठी गावाला आणि शहराला मी रोज वेगळ्या वेगळ्या मापाने तोलत असतो...
आतापर्यंत तरी गावाच पारड आई -वडील , शेती , नातेवाईक , चुलते , सण , समारंभ , देव , हवा, जेवण, मानसिक आधार , समाधाना, मुळे एकबाजूला झुकलेले आहे...
Comments
Post a Comment