Skip to main content

फितुरांच्या गर्दीत मराठ्यांचा राजा एकनिष्ठ !

2025 उजाडला आहे , महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार स्थापन झालेले आहे ...जानेवारी च्या सुरुवातीला बीड च्या सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड , धाराशिव ,जालना , परभणी, संभाजी नगर ,सह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाले , सर्व पक्षातील पदाधिकारी या निषेध मोर्चा मध्ये होते , सुरेश धस (भाजप) संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) प्रकाश सोळंके (अजित पवार गट) अंबादास दानवे (उद्धव ठाकरे ) या सर्व नेत्यांनी या हत्येचा निषेध केला ,


 पण या प्रकरणात " जारांगे पाटील " हा माणूस बाहेर काढला तर , हे सर्व नेते  मिळून आंदोलन उभं करता आलं असत का , हा मोठा प्रश्न आहे ?

         

       कारण जारांगे पाटील हे महाराष्ट्राच्या समाजकारणात  आणी राजकारणात गेल्या दीड वर्षात अविभाज्य भाग झालेले आहेत ..मराठा समाजाला "मराठावादी " भूमिकेचं महत्व त्यांनी पटवून दिले , जर आज मराठा , एक समाज म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माघे उभा राहिला तो फक्त जारांगे पाटलांच्या मुळेच !

 आज बीड मध्ये ज्या मुंढे घराण्याच्या या संघटित गुन्हेगारी ला चोख प्रत्युत्तर भेटलं आहे हे फक्त जारांगे यांच्या मुळेच..


              गावठी भाषा , कितिही मोठ्या नेत्याला सरळ अंगावर घेण्याची क्षमता , आणि जशास तस प्रत्युत्तर देण्याची प्रवृत्ती , आज मराठा समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द , यामुके मनोज जारांगे पाटील  यांनी आज प्रस्तापित मराठा राजघराणे आणि मराठा नेते यांना शह दिला आहे...

यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणाच्या काळात भाजप आमदारांना पाचारण केलेले आहे , 1) मुंदडा 2) धस 3) अभिमन्यू पवार 4) नरेंद्र पाटील यासारखे भाजप आमदार आज संतोष देशमुख यांच्या निषेध मोर्चा मध्ये भाषण करताना दिसतात..
मराठा समाजाने यावरूनच जारांगे पाटलांची किंमत आज महाराष्ट्रामध्ये कीती आहे हे ओळखावे ! 
जारांगे पाटील भाजप शी संगनमत करत नाही ,अस दिसल्यानंतर भाजप आमदार जारांगे पाटलांच्या मोर्चात पाठवून फडणवीस यांनी एक तिर में  जारांगे , पंकजा, आणि धनंजय मुंडे यांना शह दिला आहे..

2013 jarange patil protect for maratha reservation against congress 
government
               

   मराठा समाज परत एकदा 25 जानेवारीला OBC आरक्षना साठी  साखळी उपोषण करणार आहे...त्यामुळे जारांगे पाटलांच्या भूमिकेच्या ठामपणे पाठीमाघे राहणं गरजेचं आहे...कारण सत्ताधारी परत एकदा बीड मध्ये ज्या प्रमाणे भाजप प्रणित आमदार घुसवण्यात आले त्याच प्रमाणे आरक्षणामध्ये ही घुसवण्याची शक्यता आहे ! कारण काळ वाईट आहे !

         



         मराठा समाजाला ही जाणीव असणं गरजेचं आहे की , आपण जारांगे पाटील नावाच्या आशा माणसाला पाठिंबा देत ,आहोत की ज्याने गेली 15 वर्ष मराठा समाजासाठी 10 वेळा आमरण उपोषण , 20-25 वेळा मोर्चे , आणि प्रसंगी समाजासाठी सलग 17 दिवस आमरण उपोषण ....


मुंबई ची वारी कोण विसरेल ! सरंजामी मराठा नेेेते काँग्रेस (देशमुख -लातूर , पाटील - कोल्हापूर , थोरात -संगमनेर ) , शरद पवार गट (पवार घराणे , पाटील - इस्लामपूर , मोहिते पाटील - अकलूज ) भाजप (भोसले घराणे- सातारा  , पाटील - शिर्डी , तावडे , शेलार , अशोकराव , दानवे  ) शिवसेना -( एकनाथराव , भुमरे , भुसे ) उद्धव सेना ( दानवे अंबादास , ) अजित पवार गट , यामधील एकही मराठा  नेेता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या भूमिकेेेचा नाही )

              त्यामुळे जरांगे पाटलांच्या माघे हातावर मोजण्याइतके नेते बरोबर आहेत (बाप्पा सोनवणे , धस ,)

त्यामुळे मराठा समाजाची आणि त्यातही खासकरून तरुणांची जबाबदारी आहे की , ह्या पुढील काळात मार्केटिंग च काम तुम्हाला करावं लागणार आहे.watsapp status , facebook status ,post आणि जमलं तर विडिओ आणि ब्लॉग पोस्ट , लिहाव्या लागणार आहेत...कारण आता ही लढाई गरजवंत मराठा विरुद्ध सरंजामी मराठा अशी झालेली आहे...)

(http://learnmarketing9201.blogspot.com/2025/01/blog-post_15.html ) 

शेवटी 25 जानेवारी च्या आंदोलनात सहभागी होऊन पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल

हा शेवटचा फोटो हा खास जे , म्हणतात जारांगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे म्हणून , 2013 साली शरद पवारांचच सरकार होत , तेव्हा चा आंदोलनाचा हा फोटो...





Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...