Skip to main content

फितुरांच्या गर्दीत मराठ्यांचा राजा एकनिष्ठ !

2025 उजाडला आहे , महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार स्थापन झालेले आहे ...जानेवारी च्या सुरुवातीला बीड च्या सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड , धाराशिव ,जालना , परभणी, संभाजी नगर ,सह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाले , सर्व पक्षातील पदाधिकारी या निषेध मोर्चा मध्ये होते , सुरेश धस (भाजप) संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) प्रकाश सोळंके (अजित पवार गट) अंबादास दानवे (उद्धव ठाकरे ) या सर्व नेत्यांनी या हत्येचा निषेध केला ,


 पण या प्रकरणात " जारांगे पाटील " हा माणूस बाहेर काढला तर , हे सर्व नेते  मिळून आंदोलन उभं करता आलं असत का , हा मोठा प्रश्न आहे ?

         

       कारण जारांगे पाटील हे महाराष्ट्राच्या समाजकारणात  आणी राजकारणात गेल्या दीड वर्षात अविभाज्य भाग झालेले आहेत ..मराठा समाजाला "मराठावादी " भूमिकेचं महत्व त्यांनी पटवून दिले , जर आज मराठा , एक समाज म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माघे उभा राहिला तो फक्त जारांगे पाटलांच्या मुळेच !

 आज बीड मध्ये ज्या मुंढे घराण्याच्या या संघटित गुन्हेगारी ला चोख प्रत्युत्तर भेटलं आहे हे फक्त जारांगे यांच्या मुळेच..


              गावठी भाषा , कितिही मोठ्या नेत्याला सरळ अंगावर घेण्याची क्षमता , आणि जशास तस प्रत्युत्तर देण्याची प्रवृत्ती , आज मराठा समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द , यामुके मनोज जारांगे पाटील  यांनी आज प्रस्तापित मराठा राजघराणे आणि मराठा नेते यांना शह दिला आहे...

यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणाच्या काळात भाजप आमदारांना पाचारण केलेले आहे , 1) मुंदडा 2) धस 3) अभिमन्यू पवार 4) नरेंद्र पाटील यासारखे भाजप आमदार आज संतोष देशमुख यांच्या निषेध मोर्चा मध्ये भाषण करताना दिसतात..
मराठा समाजाने यावरूनच जारांगे पाटलांची किंमत आज महाराष्ट्रामध्ये कीती आहे हे ओळखावे ! 
जारांगे पाटील भाजप शी संगनमत करत नाही ,अस दिसल्यानंतर भाजप आमदार जारांगे पाटलांच्या मोर्चात पाठवून फडणवीस यांनी एक तिर में  जारांगे , पंकजा, आणि धनंजय मुंडे यांना शह दिला आहे..

2013 jarange patil protect for maratha reservation against congress 
government
               

   मराठा समाज परत एकदा 25 जानेवारीला OBC आरक्षना साठी  साखळी उपोषण करणार आहे...त्यामुळे जारांगे पाटलांच्या भूमिकेच्या ठामपणे पाठीमाघे राहणं गरजेचं आहे...कारण सत्ताधारी परत एकदा बीड मध्ये ज्या प्रमाणे भाजप प्रणित आमदार घुसवण्यात आले त्याच प्रमाणे आरक्षणामध्ये ही घुसवण्याची शक्यता आहे ! कारण काळ वाईट आहे !

         



         मराठा समाजाला ही जाणीव असणं गरजेचं आहे की , आपण जारांगे पाटील नावाच्या आशा माणसाला पाठिंबा देत ,आहोत की ज्याने गेली 15 वर्ष मराठा समाजासाठी 10 वेळा आमरण उपोषण , 20-25 वेळा मोर्चे , आणि प्रसंगी समाजासाठी सलग 17 दिवस आमरण उपोषण ....


मुंबई ची वारी कोण विसरेल ! सरंजामी मराठा नेेेते काँग्रेस (देशमुख -लातूर , पाटील - कोल्हापूर , थोरात -संगमनेर ) , शरद पवार गट (पवार घराणे , पाटील - इस्लामपूर , मोहिते पाटील - अकलूज ) भाजप (भोसले घराणे- सातारा  , पाटील - शिर्डी , तावडे , शेलार , अशोकराव , दानवे  ) शिवसेना -( एकनाथराव , भुमरे , भुसे ) उद्धव सेना ( दानवे अंबादास , ) अजित पवार गट , यामधील एकही मराठा  नेेता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या भूमिकेेेचा नाही )

              त्यामुळे जरांगे पाटलांच्या माघे हातावर मोजण्याइतके नेते बरोबर आहेत (बाप्पा सोनवणे , धस ,)

त्यामुळे मराठा समाजाची आणि त्यातही खासकरून तरुणांची जबाबदारी आहे की , ह्या पुढील काळात मार्केटिंग च काम तुम्हाला करावं लागणार आहे.watsapp status , facebook status ,post आणि जमलं तर विडिओ आणि ब्लॉग पोस्ट , लिहाव्या लागणार आहेत...कारण आता ही लढाई गरजवंत मराठा विरुद्ध सरंजामी मराठा अशी झालेली आहे...)

(http://learnmarketing9201.blogspot.com/2025/01/blog-post_15.html ) 

शेवटी 25 जानेवारी च्या आंदोलनात सहभागी होऊन पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल

हा शेवटचा फोटो हा खास जे , म्हणतात जारांगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे म्हणून , 2013 साली शरद पवारांचच सरकार होत , तेव्हा चा आंदोलनाचा हा फोटो...





Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...