Skip to main content

फितुरांच्या गर्दीत मराठ्यांचा राजा एकनिष्ठ !

2025 उजाडला आहे , महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार स्थापन झालेले आहे ...जानेवारी च्या सुरुवातीला बीड च्या सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड , धाराशिव ,जालना , परभणी, संभाजी नगर ,सह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाले , सर्व पक्षातील पदाधिकारी या निषेध मोर्चा मध्ये होते , सुरेश धस (भाजप) संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) प्रकाश सोळंके (अजित पवार गट) अंबादास दानवे (उद्धव ठाकरे ) या सर्व नेत्यांनी या हत्येचा निषेध केला ,


 पण या प्रकरणात " जारांगे पाटील " हा माणूस बाहेर काढला तर , हे सर्व नेते  मिळून आंदोलन उभं करता आलं असत का , हा मोठा प्रश्न आहे ?

         

       कारण जारांगे पाटील हे महाराष्ट्राच्या समाजकारणात  आणी राजकारणात गेल्या दीड वर्षात अविभाज्य भाग झालेले आहेत ..मराठा समाजाला "मराठावादी " भूमिकेचं महत्व त्यांनी पटवून दिले , जर आज मराठा , एक समाज म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माघे उभा राहिला तो फक्त जारांगे पाटलांच्या मुळेच !

 आज बीड मध्ये ज्या मुंढे घराण्याच्या या संघटित गुन्हेगारी ला चोख प्रत्युत्तर भेटलं आहे हे फक्त जारांगे यांच्या मुळेच..


              गावठी भाषा , कितिही मोठ्या नेत्याला सरळ अंगावर घेण्याची क्षमता , आणि जशास तस प्रत्युत्तर देण्याची प्रवृत्ती , आज मराठा समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द , यामुके मनोज जारांगे पाटील  यांनी आज प्रस्तापित मराठा राजघराणे आणि मराठा नेते यांना शह दिला आहे...

यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणाच्या काळात भाजप आमदारांना पाचारण केलेले आहे , 1) मुंदडा 2) धस 3) अभिमन्यू पवार 4) नरेंद्र पाटील यासारखे भाजप आमदार आज संतोष देशमुख यांच्या निषेध मोर्चा मध्ये भाषण करताना दिसतात..
मराठा समाजाने यावरूनच जारांगे पाटलांची किंमत आज महाराष्ट्रामध्ये कीती आहे हे ओळखावे ! 
जारांगे पाटील भाजप शी संगनमत करत नाही ,अस दिसल्यानंतर भाजप आमदार जारांगे पाटलांच्या मोर्चात पाठवून फडणवीस यांनी एक तिर में  जारांगे , पंकजा, आणि धनंजय मुंडे यांना शह दिला आहे..

2013 jarange patil protect for maratha reservation against congress 
government
               

   मराठा समाज परत एकदा 25 जानेवारीला OBC आरक्षना साठी  साखळी उपोषण करणार आहे...त्यामुळे जारांगे पाटलांच्या भूमिकेच्या ठामपणे पाठीमाघे राहणं गरजेचं आहे...कारण सत्ताधारी परत एकदा बीड मध्ये ज्या प्रमाणे भाजप प्रणित आमदार घुसवण्यात आले त्याच प्रमाणे आरक्षणामध्ये ही घुसवण्याची शक्यता आहे ! कारण काळ वाईट आहे !

         



         मराठा समाजाला ही जाणीव असणं गरजेचं आहे की , आपण जारांगे पाटील नावाच्या आशा माणसाला पाठिंबा देत ,आहोत की ज्याने गेली 15 वर्ष मराठा समाजासाठी 10 वेळा आमरण उपोषण , 20-25 वेळा मोर्चे , आणि प्रसंगी समाजासाठी सलग 17 दिवस आमरण उपोषण ....


मुंबई ची वारी कोण विसरेल ! सरंजामी मराठा नेेेते काँग्रेस (देशमुख -लातूर , पाटील - कोल्हापूर , थोरात -संगमनेर ) , शरद पवार गट (पवार घराणे , पाटील - इस्लामपूर , मोहिते पाटील - अकलूज ) भाजप (भोसले घराणे- सातारा  , पाटील - शिर्डी , तावडे , शेलार , अशोकराव , दानवे  ) शिवसेना -( एकनाथराव , भुमरे , भुसे ) उद्धव सेना ( दानवे अंबादास , ) अजित पवार गट , यामधील एकही मराठा  नेेता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या भूमिकेेेचा नाही )

              त्यामुळे जरांगे पाटलांच्या माघे हातावर मोजण्याइतके नेते बरोबर आहेत (बाप्पा सोनवणे , धस ,)

त्यामुळे मराठा समाजाची आणि त्यातही खासकरून तरुणांची जबाबदारी आहे की , ह्या पुढील काळात मार्केटिंग च काम तुम्हाला करावं लागणार आहे.watsapp status , facebook status ,post आणि जमलं तर विडिओ आणि ब्लॉग पोस्ट , लिहाव्या लागणार आहेत...कारण आता ही लढाई गरजवंत मराठा विरुद्ध सरंजामी मराठा अशी झालेली आहे...)

(http://learnmarketing9201.blogspot.com/2025/01/blog-post_15.html ) 

शेवटी 25 जानेवारी च्या आंदोलनात सहभागी होऊन पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल

हा शेवटचा फोटो हा खास जे , म्हणतात जारांगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे म्हणून , 2013 साली शरद पवारांचच सरकार होत , तेव्हा चा आंदोलनाचा हा फोटो...





Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...