Skip to main content

लोकल business साठी digital मार्केटिंग काळाची गरज !

डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व आणि लोकल व्यवसायांसाठी त्याचा उपयोग

आजच्या 21व्या शतकात आपण पाहतो की दर 5-6 वर्षांनी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे नवीन नोकऱ्या आणि व्यवसाय निर्माण होत असतानाच काही पारंपरिक व्यवसाय नामशेष होताना दिसतात. जसे की, 5-6 वर्षांपूर्वी आलेले Jio, त्यानंतर PhonePe, Google Pay आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल मार्केटिंगने व्यवसाय जगतात दूरगामी बदल घडवले आहेत.

यामुळे प्रश्न निर्माण होतो की, 2025 मध्ये गावांतील तसेच शहरांतील लहान दुकानदारांना डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व समजले आहे का?

  1. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?digital marketing infographics

डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपला व्यवसाय ऑनलाइन माध्यमांतून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. यात खालील पद्धतींचा समावेश होतो –

  1. कंटेंट मार्केटिंग – व्हिडिओ, फोटो, ब्लॉगद्वारे व्यवसायाचा प्रचार

  2. ई-मेल मार्केटिंग – ग्राहकांशी थेट संपर्क साधून नवीन उत्पादने किंवा ऑफरची माहिती देणे

  3. सोशल मीडिया मार्केटिंग – इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे ब्रँड प्रमोशन

  4. Quora मार्केटिंग – प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ब्रँडची विश्वासार्हता निर्माण करणे

  5. Google आणि Facebook Ads – पेड जाहिरातींद्वारे व्यवसायाचा प्रचार

  6. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग – प्रसिद्ध व्यक्तींमार्फत उत्पादनांची जाहिरात करणे

  7. SEO (Search Engine Optimization) – व्यवसाय किंवा उत्पादन Google सारख्या सर्च इंजिनमध्ये टॉप रँकिंगमध्ये आणणे

  1. लोकल व्यवसायांसाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग कसा करावा?

उदाहरणार्थ, एक शेतकरी जो भाजीपाला विकतो, त्याला डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून व्यवसाय वाढवायचा असेल, तर त्याने खालील गोष्टी केल्या पाहिजेत –

सोशल मीडिया ग्रुप तयार करणे – फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर व्यवसायाचे ग्रुप आणि पेज तयार करावे.

ब्रँड ओळख निर्माण करणे – चांगले DP (Profile Picture) ठेवावे, व्यवसायाचे आकर्षक नाव आणि टॅगलाईन निवडावी.

कंटेंट शेअर करणे – भाजीपाला, दूध, दही, तूप यांसारख्या उत्पादनांचे फोटो, व्हिडिओ आणि ब्लॉग Canva सारख्या अॅप्सच्या मदतीने तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करावे.

ई-मेल मार्केटिंग – नियमित ग्राहकांना ई-मेलद्वारे नवीन उत्पादनांची माहिती द्यावी.

SEO चा वापर करणे – योग्य Keyword Research करून Google सर्चमध्ये आपला व्यवसाय टॉपवर आणण्याचा प्रयत्न करावा.

Google Analytics चा वापर – जाहिराती आणि पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचत आहेत, याचे विश्लेषण करून सुधारणा करावी.

  1. डिजिटल मार्केटिंगचे फायदे

डिजिटल मार्केटिंगचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत

  1. मार्केटिंगसाठी खर्च कमी येतो – पारंपरिक जाहिरातींच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग स्वस्त असते.

  2. मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते – सोशल मीडियामुळे कमी वेळात आणि कमी खर्चात मोठ्या संख्येने लोकांपर्यंत व्यवसाय पोहोचवता येतो.

  3. मार्केटिंगचे निकाल मोजता येतात – Google Analytics आणि इतर साधनांद्वारे जाहिरातींचे परिणाम तपासून व्यवसाय सुधारता येतो.

संदर्भ - 

1)blog


Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...