Skip to main content

महाराष्ट्रात आंबेडकरवादाचे मारेकरी कोण ?

भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाले , ह्या वर्षात भारतातील sc ,st , obc ,स्त्रिया , यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिल 
 " हिंदू कोड '' साठी प्रचंड विरोध असताना त्यासाठी बाबासाहेबांनी हट्ट धरला , प्रसंगी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला , sc , st , obc साठी 2000 वर्ष पूर्वीची अन्यायी व्यवस्थेला सुरुंग लावून आरक्षण विविध योजना , आणि  कलमांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला ..
तरीसुद्धा sc , st , obc , स्त्रिया कोणीच बाबासाहेबांना का मानत नाही ? शिवाय आंबेडकरी समाज ! कृपया हा फॉर्म भरा
हा मोठा गहन प्रश्न आज  भारताच्या आंबेडकरी चळवळीतील लोंकांच्या पुढे आहे !

याची मुख्य कारणे :

१) डाव्या चळवळीतीळ प्रस्थापित नेते !
२) आंबेडकरी नेते !
३) शाळा कॉलेज !
4) आत्यंतिक डावे नेते !
5) सर्वमान्य नेतृत्व .
6) काँग्रेस
7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग !
8) सामाजिक भीती 

1) डाव्या चळवळीतील प्रस्थापित नेते:


डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी आर्थिक विषमतेवर भर दिला, परंतु जातीय विषमतेला फारसा प्राधान्य दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही.शरद पवार ,काँग्रेसने आंबडकरी विचारांचे नेते मोठे होऊन दिले नाहीत ( जितेंद्र आव्हाड अपवाद ) 


2) आंबेडकरी नेते:


आंबेडकरी समाजाचे अनेक नेते आपापल्या राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबांचे नाव वापरत राहिले, पण त्यांच्या विचारांना आणि उद्दिष्टांना न्याय देण्याचे प्रयत्न फार कमी झाले. अनेकजण आपल्या छोट्या गटांमध्ये विभागले गेले, त्यामुळे व्यापक एकता निर्माण होऊ शकली नाही, माननीय कांशीराम साहेबांनि जे सर्वसमावेशक धोरण उत्तरप्रदेश मध्ये राबून 15 वर्ष सत्ता आणली ,तशी सर्वसमावेशकता आंबेडकर , आठवले ,कवाडे  , यांच्या टोकाच्या विरोधामुळे आणता आली नाही ..


3) शाळा-कॉलेज:


शिक्षण संस्थांमध्ये आंबेडकर विचारांचा समावेश पुरेशा प्रमाणात झालेला नाही. अनेकदा इतिहासात बाबासाहेबांचे योगदान केवळ संविधान निर्मितीपुरते मर्यादित करून शिकवले जाते. त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा विषयक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.याला जबाबदार शिक्षण व्ययस्थेतील वरच्या बाजूस बसणारे लोक आहेत , आज पण आपण पाहतो विद्यापीठाचे कुलगुरू , प्राचार्य हे विशिष्ठ समाजाचे घेतले जातात , खाजगी शिक्षण संस्था , अभ्यासक्रम बनवणारी मंडळी बहुतांश आज पण ब्राह्मण समाजातील किंवा उजव्या परिवारातील आहेत ..विवेक  ,चिकित्सा  , यांचा अभाव आपल्याला सहज दिसून येतो..


4) आत्यंतिक डावे नेते:


या गटाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपेक्षा मार्क्सवादाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष यातील फरक समजून घेतला गेला नाही.आणखी एक म्हणजे कायम देवांना शिव्या घालणारे नेते , यांनी भाषा वापरताना (खालची ) भाषा वापरली त्यामुळे चळवळीची आपुलकी वाटण्याच्या जागी लोकांच्या मनात भीती वाटू लागली..


5) सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव:


बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करणारे एकत्रित आणि प्रभावी नेतृत्व तयार होऊ शकले नाही. त्यामुळे समाज वेगवेगळ्या दिशांना विभागला गेला.आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतील सर्वसमावेशक नेता कोणता तर उत्तर भेटत नाही , प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या मुळे आज नवबौद्ध च त्यांना मतदान करत नाही..शेती , पाणी , रोजगार ,मजूर ,ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे पाठ करून फक्त सामाजिक चळवळ रेटल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे आज डबके झाले आहे..


6) काँग्रेस:


काँग्रेस पक्षाने दीर्घकाळ आपली राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी दलित समाजाला फक्त मतबँक म्हणून पाहिले. बाबासाहेबांचे विचार रुजण्याऐवजी त्यांना मर्यादित स्वरूपात स्वीकारले गेले.


7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग 

आज sc ,st , obc समाज शिकला आहे ,मी स्वतः पाहिलेले आहे की शिक्षक , इंजिनियर , डॉक्टर , सरकारी नोकरदार ,या लोकांना "आंबेडकरवाद " कळायला लागला आहे पण आंबेडकर वाद आपण संगायला लागलो तर समाज स्वीकारेल का ह्या भीतीने ते अस्वस्थ आहेत ..सर्व योजनांचा  लाभ घेऊन काहींनी स्वतःची प्रगती साधली, पण समाजातील इतरांना मदत करण्याची जबाबदारी फारच कमी लोकांनी घेतली.


8) सामाजिक भीती:


जातिव्यवस्थेच्या विरोधात उभे राहिल्यास सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे अनेक लोक बाबासाहेबांच्या विचारांवर उघड भूमिका घेत नाहीत.


Rss असेल , किंवा भाजप यांना या भारतात फक्त आंबेडकरवाद पुरून उरु शकतो ,पण आज दुर्दैवाने बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य ज्या विचारधारेच्या विरोधात एकट्याने उभं राहून जे वैभव sc , st, obc साठी उभं केलं होतं त्यावर आज तेच sc st obc  आंबेडकर वादावर कुऱ्हाड चालवण्याचे काम करत आहेत ..


Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...