Skip to main content

महाराष्ट्रात आंबेडकरवादाचे मारेकरी कोण ?

भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाले , ह्या वर्षात भारतातील sc ,st , obc ,स्त्रिया , यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिल 
 " हिंदू कोड '' साठी प्रचंड विरोध असताना त्यासाठी बाबासाहेबांनी हट्ट धरला , प्रसंगी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला , sc , st , obc साठी 2000 वर्ष पूर्वीची अन्यायी व्यवस्थेला सुरुंग लावून आरक्षण विविध योजना , आणि  कलमांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला ..
तरीसुद्धा sc , st , obc , स्त्रिया कोणीच बाबासाहेबांना का मानत नाही ? शिवाय आंबेडकरी समाज ! कृपया हा फॉर्म भरा
हा मोठा गहन प्रश्न आज  भारताच्या आंबेडकरी चळवळीतील लोंकांच्या पुढे आहे !

याची मुख्य कारणे :

१) डाव्या चळवळीतीळ प्रस्थापित नेते !
२) आंबेडकरी नेते !
३) शाळा कॉलेज !
4) आत्यंतिक डावे नेते !
5) सर्वमान्य नेतृत्व .
6) काँग्रेस
7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग !
8) सामाजिक भीती 

1) डाव्या चळवळीतील प्रस्थापित नेते:


डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी आर्थिक विषमतेवर भर दिला, परंतु जातीय विषमतेला फारसा प्राधान्य दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही.शरद पवार ,काँग्रेसने आंबडकरी विचारांचे नेते मोठे होऊन दिले नाहीत ( जितेंद्र आव्हाड अपवाद ) 


2) आंबेडकरी नेते:


आंबेडकरी समाजाचे अनेक नेते आपापल्या राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबांचे नाव वापरत राहिले, पण त्यांच्या विचारांना आणि उद्दिष्टांना न्याय देण्याचे प्रयत्न फार कमी झाले. अनेकजण आपल्या छोट्या गटांमध्ये विभागले गेले, त्यामुळे व्यापक एकता निर्माण होऊ शकली नाही, माननीय कांशीराम साहेबांनि जे सर्वसमावेशक धोरण उत्तरप्रदेश मध्ये राबून 15 वर्ष सत्ता आणली ,तशी सर्वसमावेशकता आंबेडकर , आठवले ,कवाडे  , यांच्या टोकाच्या विरोधामुळे आणता आली नाही ..


3) शाळा-कॉलेज:


शिक्षण संस्थांमध्ये आंबेडकर विचारांचा समावेश पुरेशा प्रमाणात झालेला नाही. अनेकदा इतिहासात बाबासाहेबांचे योगदान केवळ संविधान निर्मितीपुरते मर्यादित करून शिकवले जाते. त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा विषयक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.याला जबाबदार शिक्षण व्ययस्थेतील वरच्या बाजूस बसणारे लोक आहेत , आज पण आपण पाहतो विद्यापीठाचे कुलगुरू , प्राचार्य हे विशिष्ठ समाजाचे घेतले जातात , खाजगी शिक्षण संस्था , अभ्यासक्रम बनवणारी मंडळी बहुतांश आज पण ब्राह्मण समाजातील किंवा उजव्या परिवारातील आहेत ..विवेक  ,चिकित्सा  , यांचा अभाव आपल्याला सहज दिसून येतो..


4) आत्यंतिक डावे नेते:


या गटाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपेक्षा मार्क्सवादाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष यातील फरक समजून घेतला गेला नाही.आणखी एक म्हणजे कायम देवांना शिव्या घालणारे नेते , यांनी भाषा वापरताना (खालची ) भाषा वापरली त्यामुळे चळवळीची आपुलकी वाटण्याच्या जागी लोकांच्या मनात भीती वाटू लागली..


5) सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव:


बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करणारे एकत्रित आणि प्रभावी नेतृत्व तयार होऊ शकले नाही. त्यामुळे समाज वेगवेगळ्या दिशांना विभागला गेला.आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतील सर्वसमावेशक नेता कोणता तर उत्तर भेटत नाही , प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या मुळे आज नवबौद्ध च त्यांना मतदान करत नाही..शेती , पाणी , रोजगार ,मजूर ,ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे पाठ करून फक्त सामाजिक चळवळ रेटल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे आज डबके झाले आहे..


6) काँग्रेस:


काँग्रेस पक्षाने दीर्घकाळ आपली राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी दलित समाजाला फक्त मतबँक म्हणून पाहिले. बाबासाहेबांचे विचार रुजण्याऐवजी त्यांना मर्यादित स्वरूपात स्वीकारले गेले.


7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग 

आज sc ,st , obc समाज शिकला आहे ,मी स्वतः पाहिलेले आहे की शिक्षक , इंजिनियर , डॉक्टर , सरकारी नोकरदार ,या लोकांना "आंबेडकरवाद " कळायला लागला आहे पण आंबेडकर वाद आपण संगायला लागलो तर समाज स्वीकारेल का ह्या भीतीने ते अस्वस्थ आहेत ..सर्व योजनांचा  लाभ घेऊन काहींनी स्वतःची प्रगती साधली, पण समाजातील इतरांना मदत करण्याची जबाबदारी फारच कमी लोकांनी घेतली.


8) सामाजिक भीती:


जातिव्यवस्थेच्या विरोधात उभे राहिल्यास सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे अनेक लोक बाबासाहेबांच्या विचारांवर उघड भूमिका घेत नाहीत.


Rss असेल , किंवा भाजप यांना या भारतात फक्त आंबेडकरवाद पुरून उरु शकतो ,पण आज दुर्दैवाने बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य ज्या विचारधारेच्या विरोधात एकट्याने उभं राहून जे वैभव sc , st, obc साठी उभं केलं होतं त्यावर आज तेच sc st obc  आंबेडकर वादावर कुऱ्हाड चालवण्याचे काम करत आहेत ..


Comments

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...