Skip to main content

महाराष्ट्रात आंबेडकरवादाचे मारेकरी कोण ?

भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाले , ह्या वर्षात भारतातील sc ,st , obc ,स्त्रिया , यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिल 
 " हिंदू कोड '' साठी प्रचंड विरोध असताना त्यासाठी बाबासाहेबांनी हट्ट धरला , प्रसंगी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला , sc , st , obc साठी 2000 वर्ष पूर्वीची अन्यायी व्यवस्थेला सुरुंग लावून आरक्षण विविध योजना , आणि  कलमांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला ..
तरीसुद्धा sc , st , obc , स्त्रिया कोणीच बाबासाहेबांना का मानत नाही ? शिवाय आंबेडकरी समाज ! कृपया हा फॉर्म भरा
हा मोठा गहन प्रश्न आज  भारताच्या आंबेडकरी चळवळीतील लोंकांच्या पुढे आहे !

याची मुख्य कारणे :

१) डाव्या चळवळीतीळ प्रस्थापित नेते !
२) आंबेडकरी नेते !
३) शाळा कॉलेज !
4) आत्यंतिक डावे नेते !
5) सर्वमान्य नेतृत्व .
6) काँग्रेस
7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग !
8) सामाजिक भीती 

1) डाव्या चळवळीतील प्रस्थापित नेते:


डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी आर्थिक विषमतेवर भर दिला, परंतु जातीय विषमतेला फारसा प्राधान्य दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही.शरद पवार ,काँग्रेसने आंबडकरी विचारांचे नेते मोठे होऊन दिले नाहीत ( जितेंद्र आव्हाड अपवाद ) 


2) आंबेडकरी नेते:


आंबेडकरी समाजाचे अनेक नेते आपापल्या राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबांचे नाव वापरत राहिले, पण त्यांच्या विचारांना आणि उद्दिष्टांना न्याय देण्याचे प्रयत्न फार कमी झाले. अनेकजण आपल्या छोट्या गटांमध्ये विभागले गेले, त्यामुळे व्यापक एकता निर्माण होऊ शकली नाही, माननीय कांशीराम साहेबांनि जे सर्वसमावेशक धोरण उत्तरप्रदेश मध्ये राबून 15 वर्ष सत्ता आणली ,तशी सर्वसमावेशकता आंबेडकर , आठवले ,कवाडे  , यांच्या टोकाच्या विरोधामुळे आणता आली नाही ..


3) शाळा-कॉलेज:


शिक्षण संस्थांमध्ये आंबेडकर विचारांचा समावेश पुरेशा प्रमाणात झालेला नाही. अनेकदा इतिहासात बाबासाहेबांचे योगदान केवळ संविधान निर्मितीपुरते मर्यादित करून शिकवले जाते. त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा विषयक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.याला जबाबदार शिक्षण व्ययस्थेतील वरच्या बाजूस बसणारे लोक आहेत , आज पण आपण पाहतो विद्यापीठाचे कुलगुरू , प्राचार्य हे विशिष्ठ समाजाचे घेतले जातात , खाजगी शिक्षण संस्था , अभ्यासक्रम बनवणारी मंडळी बहुतांश आज पण ब्राह्मण समाजातील किंवा उजव्या परिवारातील आहेत ..विवेक  ,चिकित्सा  , यांचा अभाव आपल्याला सहज दिसून येतो..


4) आत्यंतिक डावे नेते:


या गटाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपेक्षा मार्क्सवादाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष यातील फरक समजून घेतला गेला नाही.आणखी एक म्हणजे कायम देवांना शिव्या घालणारे नेते , यांनी भाषा वापरताना (खालची ) भाषा वापरली त्यामुळे चळवळीची आपुलकी वाटण्याच्या जागी लोकांच्या मनात भीती वाटू लागली..


5) सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव:


बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करणारे एकत्रित आणि प्रभावी नेतृत्व तयार होऊ शकले नाही. त्यामुळे समाज वेगवेगळ्या दिशांना विभागला गेला.आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतील सर्वसमावेशक नेता कोणता तर उत्तर भेटत नाही , प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या मुळे आज नवबौद्ध च त्यांना मतदान करत नाही..शेती , पाणी , रोजगार ,मजूर ,ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे पाठ करून फक्त सामाजिक चळवळ रेटल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे आज डबके झाले आहे..


6) काँग्रेस:


काँग्रेस पक्षाने दीर्घकाळ आपली राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी दलित समाजाला फक्त मतबँक म्हणून पाहिले. बाबासाहेबांचे विचार रुजण्याऐवजी त्यांना मर्यादित स्वरूपात स्वीकारले गेले.


7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग 

आज sc ,st , obc समाज शिकला आहे ,मी स्वतः पाहिलेले आहे की शिक्षक , इंजिनियर , डॉक्टर , सरकारी नोकरदार ,या लोकांना "आंबेडकरवाद " कळायला लागला आहे पण आंबेडकर वाद आपण संगायला लागलो तर समाज स्वीकारेल का ह्या भीतीने ते अस्वस्थ आहेत ..सर्व योजनांचा  लाभ घेऊन काहींनी स्वतःची प्रगती साधली, पण समाजातील इतरांना मदत करण्याची जबाबदारी फारच कमी लोकांनी घेतली.


8) सामाजिक भीती:


जातिव्यवस्थेच्या विरोधात उभे राहिल्यास सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे अनेक लोक बाबासाहेबांच्या विचारांवर उघड भूमिका घेत नाहीत.


Rss असेल , किंवा भाजप यांना या भारतात फक्त आंबेडकरवाद पुरून उरु शकतो ,पण आज दुर्दैवाने बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य ज्या विचारधारेच्या विरोधात एकट्याने उभं राहून जे वैभव sc , st, obc साठी उभं केलं होतं त्यावर आज तेच sc st obc  आंबेडकर वादावर कुऱ्हाड चालवण्याचे काम करत आहेत ..


Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...