Skip to main content

कर्ज घ्यायचाय ? चला तर ,शेतकऱ्यांनो Cibil स्कोर समजावून घेऊया

आपण या ब्लॉग मध्ये 5 प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जेणेकरून शेतकरी मित्रांना आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा कर्ज घेण्यासाठी नक्की होईल ..
चला तर !
1) Cibil स्कोर म्हणजे नक्की काय ?
2) सिबील स्कोर चा इतिहास ?
3) शेतकरी आणि सिबील स्कोर ?
4) सिबील स्कोर च मोजमाप ?
5) चांगला सिबील येण्यासाठी काय करावं ...

1) सिबील स्कोर म्हणजे काय ?
Cibil स्कोर चा अर्थ आहे (credit information bureau india limited ) - कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा कर्ज परताव्याचा इतिहास , कर्जाचे हफ्ते फेडण्याचा इतिहास , कोण कोणते कर्ज घेतले , या सगळ्यांची माहिती बँक व  NBFC म्हणजे गोल्ड loan , होम fianance च्या कंपन्या , बजाज आणि muthoot finance आपल्याला माहीत आहेच की...यांना म्हणतात NBFC म्हणजे नॉन बँकिंग fianancial कंपनी ..यांना ही संस्था देते ...

2) इतिहास :-
मुळात ही संस्था 2000 साली स्थापन , झाली पण 2007 पासून काम सुरू झालं ...
कर्ज घेणाऱ्या ग्राहक किंवा company यांचा कर्जाची परतफेड कशाप्रकारे करतात , यावर नियंत्रण व सुसूत्रता आणण्यासाठी cibil स्कोर चा वापर केला जातो..

३) शेतकरी आणि सिबील स्कोर :-

मुळात शेतकरी आणि सिबील आधी संबंध येत न्हवता कारण , 7/12 उतारे पाहून कर्ज (पीक , टॅक्टर ) दिले जायचे ..पण सिबील स्कोर  2017-18 पासून बँका मध्ये , शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या अगोदर सिबील report पाहणे सुरू झाले..त्यामुळे कर्ज उशीरा भरणारे किंवा बुडवणार्या शेतकऱ्यांची पंचायत झाली ..व  शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी ओळख आणि त्याचबरोबर साहेबांना  पैसे देऊन कर्ज मंजूर केलेली आहेत..
पण महत्वाचं म्हणजे गरीब शेतकरी (4 एकर क्षेत्र) असणारे यांना कर्ज भेटणे अशक्य झाले ..कारण म्हणजे Cibil score कमी थकीत पीककर्ज आणि ओळख नसणे ..

4) सिबील स्कोर चे मोजमाप ?
शकतो बँक मध्ये 650 च्या पुढे सिबील स्कोर असेल तर चांगला मानला जातो ..
पण 700 - 800 हा सर्वोत्तम cibil score आहे ..
500 म्हणजे खराब कर्ज मिळत नाही..
5) cibil स्कोर कमी का होतो ?

याच मुख्य कारण आहे वेळेवर कर्जाचे हफ्ते न भरणे ..
आणि शेतकऱ्यांमध्ये ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते की शेतकरी हफ्ते भरण्यासाठी कानाडोळा करतो ..

महत्त्वाचे - समजा तुम्ही amazon वरून 500 रुपयांच जरी कर्ज घेतले 1 महिन्यासाठी (prepaid रेचार्जे ) आणि तुम्हाला वाटलं कोण 500 रुपयांनी काय होतंय ? म्हणून 10 महिने  तो हफ्ता भरला नाही तर तुमचा cibil स्कोर 700 वरून 450 -500 दरम्यान 100% घसरणार ..कारण 90 दिवसापेक्षां जास्त उशिर म्हणजे (cibil Report मध्ये wriitten off किंवा setteld असे वाईट शब्द दिसतात )

परिणाम -1) बँकेत जेव्हा कर्ज काढायला जाता तेव्हा 500 क्रेडिट स्कोर मुळे कर्ज भेटत नाही .

2) लगेच जरी हफ्ते भरले (म्हणजे 500 credit scoreआल्यानंतर दुसऱ्या दिवशी ) तरी 1 वर्ष 700 होण्यासाठी लागतो )
3) बँका  कर्ज देणारे (फायनान्स )वाले फक्त एकच गोष्ट बघतात ती म्हणजे हा माणूस वेळेवर कर्ज भरतो की नाही ? बाकी ते कर्ज 500 असो किंवा 5000000 काही घेणं देणं नाही ..

4) चांगला सिबील ठेवण्यासाठी काय करावं ?
   1.   पहिली महत्वाची  गोष्ट म्हणजे वेळेवर हफ्ते भरा .
2) शेतकऱ्यांनि लहान  कर्ज वर्षातून किमान 2 घ्यावे म्हनजे मुलांसाठी लॅपटॉप , मोबाइल , कुटी मशीन , tv , फ्रिज , मोटर , ठिबक , यासारखे लहान मोठे कर्ज फायनान्स नेच घ्यावे कारण ही लहान कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला मोठी कर्ज दिले जातील...(छोटे शेतकरी लक्षात असुद्या )

3) टॅक्टर , घर , जमीन तारण , सौरपपं , यासारखे मोठे कर्ज घेताना 1-2% फायदा होइल व्याज दर कमी होतो..जर 750 + cibil , 10 वर्ष जुन बँक अकाउंट , 10 -12 वर्ष हफ्ते न चुकवण्याचा इतिहास असेल तर फायदा ...
4) cibil स्कोर चेक करत चला 3-4 महिन्याला 
5) चेक करण्यासाठी phone वर जावा नंतर loan >>>>>वर दाबा आणि credit स्कोर मध्ये जाऊन number >>email >>आणि pan card नंबर टाका 
6) किंवा google pay , moneycontrol , वर जाऊन चेक करा 
                     ( धन्यवाद  ! )



Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...