Skip to main content

कर्ज घ्यायचाय ? चला तर ,शेतकऱ्यांनो Cibil स्कोर समजावून घेऊया

आपण या ब्लॉग मध्ये 5 प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जेणेकरून शेतकरी मित्रांना आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा कर्ज घेण्यासाठी नक्की होईल ..
चला तर !
1) Cibil स्कोर म्हणजे नक्की काय ?
2) सिबील स्कोर चा इतिहास ?
3) शेतकरी आणि सिबील स्कोर ?
4) सिबील स्कोर च मोजमाप ?
5) चांगला सिबील येण्यासाठी काय करावं ...

1) सिबील स्कोर म्हणजे काय ?
Cibil स्कोर चा अर्थ आहे (credit information bureau india limited ) - कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा कर्ज परताव्याचा इतिहास , कर्जाचे हफ्ते फेडण्याचा इतिहास , कोण कोणते कर्ज घेतले , या सगळ्यांची माहिती बँक व  NBFC म्हणजे गोल्ड loan , होम fianance च्या कंपन्या , बजाज आणि muthoot finance आपल्याला माहीत आहेच की...यांना म्हणतात NBFC म्हणजे नॉन बँकिंग fianancial कंपनी ..यांना ही संस्था देते ...

2) इतिहास :-
मुळात ही संस्था 2000 साली स्थापन , झाली पण 2007 पासून काम सुरू झालं ...
कर्ज घेणाऱ्या ग्राहक किंवा company यांचा कर्जाची परतफेड कशाप्रकारे करतात , यावर नियंत्रण व सुसूत्रता आणण्यासाठी cibil स्कोर चा वापर केला जातो..

३) शेतकरी आणि सिबील स्कोर :-

मुळात शेतकरी आणि सिबील आधी संबंध येत न्हवता कारण , 7/12 उतारे पाहून कर्ज (पीक , टॅक्टर ) दिले जायचे ..पण सिबील स्कोर  2017-18 पासून बँका मध्ये , शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या अगोदर सिबील report पाहणे सुरू झाले..त्यामुळे कर्ज उशीरा भरणारे किंवा बुडवणार्या शेतकऱ्यांची पंचायत झाली ..व  शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी ओळख आणि त्याचबरोबर साहेबांना  पैसे देऊन कर्ज मंजूर केलेली आहेत..
पण महत्वाचं म्हणजे गरीब शेतकरी (4 एकर क्षेत्र) असणारे यांना कर्ज भेटणे अशक्य झाले ..कारण म्हणजे Cibil score कमी थकीत पीककर्ज आणि ओळख नसणे ..

4) सिबील स्कोर चे मोजमाप ?
शकतो बँक मध्ये 650 च्या पुढे सिबील स्कोर असेल तर चांगला मानला जातो ..
पण 700 - 800 हा सर्वोत्तम cibil score आहे ..
500 म्हणजे खराब कर्ज मिळत नाही..
5) cibil स्कोर कमी का होतो ?

याच मुख्य कारण आहे वेळेवर कर्जाचे हफ्ते न भरणे ..
आणि शेतकऱ्यांमध्ये ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते की शेतकरी हफ्ते भरण्यासाठी कानाडोळा करतो ..

महत्त्वाचे - समजा तुम्ही amazon वरून 500 रुपयांच जरी कर्ज घेतले 1 महिन्यासाठी (prepaid रेचार्जे ) आणि तुम्हाला वाटलं कोण 500 रुपयांनी काय होतंय ? म्हणून 10 महिने  तो हफ्ता भरला नाही तर तुमचा cibil स्कोर 700 वरून 450 -500 दरम्यान 100% घसरणार ..कारण 90 दिवसापेक्षां जास्त उशिर म्हणजे (cibil Report मध्ये wriitten off किंवा setteld असे वाईट शब्द दिसतात )

परिणाम -1) बँकेत जेव्हा कर्ज काढायला जाता तेव्हा 500 क्रेडिट स्कोर मुळे कर्ज भेटत नाही .

2) लगेच जरी हफ्ते भरले (म्हणजे 500 credit scoreआल्यानंतर दुसऱ्या दिवशी ) तरी 1 वर्ष 700 होण्यासाठी लागतो )
3) बँका  कर्ज देणारे (फायनान्स )वाले फक्त एकच गोष्ट बघतात ती म्हणजे हा माणूस वेळेवर कर्ज भरतो की नाही ? बाकी ते कर्ज 500 असो किंवा 5000000 काही घेणं देणं नाही ..

4) चांगला सिबील ठेवण्यासाठी काय करावं ?
   1.   पहिली महत्वाची  गोष्ट म्हणजे वेळेवर हफ्ते भरा .
2) शेतकऱ्यांनि लहान  कर्ज वर्षातून किमान 2 घ्यावे म्हनजे मुलांसाठी लॅपटॉप , मोबाइल , कुटी मशीन , tv , फ्रिज , मोटर , ठिबक , यासारखे लहान मोठे कर्ज फायनान्स नेच घ्यावे कारण ही लहान कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला मोठी कर्ज दिले जातील...(छोटे शेतकरी लक्षात असुद्या )

3) टॅक्टर , घर , जमीन तारण , सौरपपं , यासारखे मोठे कर्ज घेताना 1-2% फायदा होइल व्याज दर कमी होतो..जर 750 + cibil , 10 वर्ष जुन बँक अकाउंट , 10 -12 वर्ष हफ्ते न चुकवण्याचा इतिहास असेल तर फायदा ...
4) cibil स्कोर चेक करत चला 3-4 महिन्याला 
5) चेक करण्यासाठी phone वर जावा नंतर loan >>>>>वर दाबा आणि credit स्कोर मध्ये जाऊन number >>email >>आणि pan card नंबर टाका 
6) किंवा google pay , moneycontrol , वर जाऊन चेक करा 
                     ( धन्यवाद  ! )



Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...