Skip to main content

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत .. 

                         मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...
               

          महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाचे प्रमाण कमी। झाले आहे , या गोष्टी राजकीय पक्षांनी कधीच समजून न घेता वापर केला , या सर्व गोष्टी मूळ मराठा समाजाला वाटू लागले की आपला पण पक्ष असावा , मुळात या भावनेची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झालेली होती..

       --------जारांगे पाटील यांना ती संधी नारायणगड  येथील दसरा मेळावा च्या प्रसंगी आलेली होती..
१) दूध उत्पादक शेतकरी
2) पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी.
3)उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी.              4) ऊसतोड मजूर..
5) विद्यार्थी
6)मजूर
7)स्त्रिया
8) महागाई
9)मराठवादी भूमिका
10) पाणी प्रश्न 
11) भ्रष्ट्राचार 
12) मराठी शाळा
यासर्व अडचणींचा उपाय महाराष्ट्रा कडे नव्हता , जारांगे पाटलांच्या निमित्ताने तो पर्याय महाराष्ट्राला भेटला असता !

:पक्षाची मोट बांधण्याची ही सुवर्ण संधी पाटलांकडे होती !

 जारांगे पाटील (अध्यक्ष )

१) बचू कडू (कुणबी आणि शेतकरी नेते)
2) राजू शेट्टी (जैन आणि शेतकरी नेते)
3)महादेव जानकर (धनगर नेते)
4)राजरत्न आंबेडकर(दलित नवबौध्द नेते)
5)दिपक केदार (दलित नेते)
6)बाळासाहेब  सराटे (मराठा आरक्षण अभ्यासक )
7)इम्तियाज जलील (मुस्लिम नेते)
8) संभाजी राजे छत्रपती (राजघराणे )
9)विनोद पाटील (मराठानेते)
10)राजेंद्र कोंडरे (मराठा )
11) राकेश टीकेत (राष्ट्रीय शेतकरी नेते)
12)प्रसंगी प्रकाश आंबेडकर नसते आले तरी , चंद्रशेखर आजाद यांना पाचारण करता आले असते !
13)भ्रष्ट्राचार आणि शहरी मुद्यावर आम आदमी पार्टी ची मदत घेता आली असती .

14)आणि फुटलेले नेते + अपक्ष यांना मिळून पक्ष स्थापन करण्याची संधी जारांगे पटलांकडे नक्कीच होती..
                       शिवाय ज्याठिकाणी आपली ताकद नाही त्याठिकाणी मराठवादि भूमिका घेणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा दिला जाऊ शकत होता ..
एकूण 100 जागावर फोकस करून 50 जागा सहज विजयी होणे शक्य होते ..

1) मराठवाडा 50 जागा
2) विदर्भ बचू कडू + मुस्लिम+ दलित +स्थानिक पातळीवरील बंडखोर यांची मोट बांधून 20 जागा लढवल्या जाऊ शकल्या असत्या..
3) सोलापूर शहर आणि ग्रामीण मिळून 5-6 जागा ...
4)कोल्हापूर + सांगली +सातारा प्रत्येकी 5 जागा..
5)नगर +नाशिक+खानदेश 15 जागा 

पुणे  +मुंबई ठिकाणी 10 जागा आशा मिळून 100 जागा लढवल्या गेल्या असत्या तर , 50 जागा जिंकणे शक्य होते असे माझे प्रामाणिक मत होते.
         

          जारांगे पाटलांच्या समोरील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुस्लिम +मराठा+ दलित यांच्या मनामध्ये आपण जिंकू ही भावना निर्माण करणे हेच होती..जलील , राजरत्न आंबेडकर ,चंद्रशेखर आजाद , राजू शेट्टी ,  जानकर , दीपक केदार, संभाजी छत्रपती या सर्वांना एकत्र आले असते तर हे सहज शक्य होत..

                     OBC समाजात महादेव जानकर यांच्या माध्यमातून फूट पाडणे सहज शक्य होते .

:आश्वासनांचा पाऊस पाडणे सहज शक्य होते ?

आमची सत्ता आली तर ,
1) दुधाला 35-40 रुपयांचा भाव देऊ.
2)कांद्याला , कापूस , तूर , मुगाला हमीभाव देऊ.
3) मराठा विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसाहती गृह बांधू..
4) शेतकरी कर्जमाफी करू !
5) शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करू !
6) मुस्लिम आरक्षण देऊ..
7) ऊस पिकाला 3500-4000 भाव देऊ!
8) धरणे उभारणी करू !
9) धनगर समाजाला आरक्षण देऊ !
10)गॅस सिलेंडर 500 रुपयांमध्ये देऊ !
11 ) शेतकऱ्यांना पेरणी वेळी 10000 रुपयांची रोख रक्कम देऊ !
12) मजूर (गवंडी , बिगारी ,शेतमजूर ) यांच्या मजुरी मध्ये सरकार तर्फे वाढ करू )त्यांच्या मुलांचं शिक्षण फुकट करून देऊ ..

अशी अनेक आश्वासने देने सहज शक्य होते , आश्वासने पूर्ण होऊ अथवा नाही पण ती देणं गरजेचं असत ..
 

              एकूणच शरद पवार, अजित पवार ,फडणवीस, एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे या सर्वांचा राजकारण संपवण्याची संधी जारांगे पाटलांनी घालवली
तूम्हाला या विषयाबद्दल काय वाटत हे comment मध्ये नक्की कळवा !


Thank you !😊

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...