Skip to main content

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत !
चला मग एक एक करून पाहू ..
त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत.

१) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ?

२)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ?

३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ?

४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ?

१) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ?

:- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही.
उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व .
क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत .
२)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ?
जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज उठवला असता तर , हे राजकीय प्रकरण आहे असं वाटलं असतं , पण जारंगे पाटील यांच्या मुळे मराठा समाजाची साथ आणि वंजारी समाजाच्या गुंडाची दहशतीला आवाज उठवण्यासाठी जरांगे पाटील यांची गरज मराठा समाजाला वाटू लागली .जरांगे पाटील यांनी या प्रकरणाला जातीय वळण देण्याचं काम केलं,आणि हे प्रकरण देश पातळीवर गाजलं . जरांगे पाटील यांचा या मोर्चा मध्ये असणारा सहभाग बीडच्या दहशती पासून आणि वाल्मीक कराड चा गुंडा च्या काळजात नक्कीच भीती निर्माण होईल अशी आशा मराठा समाजाला आहे .
३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार  आहे का ?

मुळात संतोष देशमुख हे नमिता मुंदडा ज्या केज च्या विद्यमान आमदार आहेत ,त्यांचे ते कार्यकर्ते , देशमुख हे लोकसभेला पंकजा मुंडे यांचे बूथप्रमुख म्हणून काम केलं आहे . पण संतोष देशमुख अपहरण प्रकरणातील सर्व आरोपी हे वंजारी समाजाचे असल्याने ,मराठा समाजाला या प्रकरणाला जातीय किनार आहे हे वाटण साहजिक आहे . घुले , आंधळे, चाटे , कराड  .

४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ?

पण संतोष देशमुख प्रकरणा मध्ये
  खरा विजय हा देवेंद्र फडणवीस यांनी एका बाणात ३ पक्षी जरांगे पाटील , धनंजय आणि पंकजा मुंडे  कारण ,जरांगे पाटील यांना बीडच्या मोर्चा मध्ये सत्ताधारी पक्षाच(भाजप) कौतुक करावं लागलं कारण १)धस २)मुंदडा ३)नरेंद्र पाटील ४) अभिमन्यू पवार यासारख्या भाजप आमदारांचा पाठिंबा या मोर्चाला असल्याने जरांगे
यांची चांगलीच पंचाईत झाली, आणि नंतर त्यांना अजित पवारांवर पण , बोलता आलं नाही कारण , १) सोळंके २) पंडित ३)विटेकर हे पण अजित पवारांचे आमदार मोर्चा मध्ये उपस्थित होते.
 धनंजय मुंडे यांचे वाढणारे राजकीय अस्तित्व आणि पंख देशमुख प्रकरणाच्या निमित्ताने फडणवीस यांनी छाटले .

बीड क
 बीड मध्ये बिहार होण्याला सुरुवात खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांनी केली !
आणि याला जातीय किनार सुद्धा आहे बरका . 
कारण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या सोयीनुसार बीड मध्ये वंजारी समाजाच्या अधिकारी , शिक्षक , जी बिंदूनामावली च्या विरुद्ध जाऊन भरती करण्याची सुरुवात केली .
याचे समकालीन पुरावे उपलब्ध आहेत..
हीच रेघ पुढे पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री झाल्यानंतर ,वाल्मीक कराडांच्या मदतीने बीडला बिहार करून दाखवले .
बीड मध्ये कायम दुष्काळ , पाण्याची टंचाई , उद्योगधंद्यांची कमतरता, ऊसतोड मजुरांचा  जिल्हा म्हणून ओळख , शिक्षणाचा अभाव , आणि यातूनच होणारी दारिद्य्रता आणि वाढणारी गुंडगिरी .
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर बीडला सुध्रवण्याची संधी बीडकरांनी वारंवार मुंडे परिवाराला दिली, पण बीडच विकास सोडून ,स्वाजातीचा विकास आणि जातीच्या गुंडांना प्रोत्साहन देऊन ,इतर समाजावर मनगटाचा आणि आर्थिक कोंडी करणे हे मुंडे परिवाराने केले
 . 

* धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडांचे प्रताप ?

धनंजय मुंडे २०१९ साली पंकजा मुंडे चा पराभव करण्याच्या आधी ते विधानपरषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार होते आणि विरोधी पक्षनेते सुद्धा होते .
२०१९ नंतर धनंजय मुंडे यांनी परळी ची सूत्रे कराड यांच्या कडे दिली . यातून कराड यांनी अफाट संपत्ती , गुंडांच्या टोळ्या , आणि मानस सुद्धा कमवाली,
गोपीनाथ मुंडें यांच्या घरात घरघडी असणारा वाल्मीक आता पूर्ण बीडचा (अण्णा ) झाला , 
औद्योगिक विदुत प्रकल्प यातील राख असो
वा कुनला खंडणी वसूल करण असो ,किंवा निवडणुकीत दमदाटी , मारहाण करून जरब बसवणे असो, वाल्मीक कराड ने परळी च बिहार करून दाखवले ,
कंबरेला बंदूक ठेवून फिरणारा वाल्मीक कराड ने विरोधक आणि  गोरगरीब मानस ते राज्याचे  मंत्री या सर्वांच्या जवळचा झाला...


असो , आता फडणवीस यांच्यावर सगळ्या महाराष्ट्राची नझर आहे...
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

छत्रपती शिवरायांकडुन या 10 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनि शिकल्या पाहिजेत !

आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे  कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून   विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून  leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family  ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही ! https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharing please fill form 1) leading by example ! 2) no excuses over core values ! 3) respect to women's ! 4) start at least small business ! 5) self respect over all ! 6) staff retention tricks ! 7) The master of negotiation ! 8) impeccable character 9) believing in own strengths ! 10) tit for tat ! 1) leading by example ! अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी ...

छत्रपती संभाजी महाराज आणि ती 4 मिथके ?

आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना  डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत.. 1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ? 2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ? 3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ? 4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ? १)  संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?              संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून  महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,  ''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरब...

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...