Skip to main content

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत !
चला मग एक एक करून पाहू ..
त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत.

१) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ?

२)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ?

३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ?

४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ?

१) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ?

:- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही.
उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व .
क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत .
२)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ?
जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज उठवला असता तर , हे राजकीय प्रकरण आहे असं वाटलं असतं , पण जारंगे पाटील यांच्या मुळे मराठा समाजाची साथ आणि वंजारी समाजाच्या गुंडाची दहशतीला आवाज उठवण्यासाठी जरांगे पाटील यांची गरज मराठा समाजाला वाटू लागली .जरांगे पाटील यांनी या प्रकरणाला जातीय वळण देण्याचं काम केलं,आणि हे प्रकरण देश पातळीवर गाजलं . जरांगे पाटील यांचा या मोर्चा मध्ये असणारा सहभाग बीडच्या दहशती पासून आणि वाल्मीक कराड चा गुंडा च्या काळजात नक्कीच भीती निर्माण होईल अशी आशा मराठा समाजाला आहे .
३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार  आहे का ?

मुळात संतोष देशमुख हे नमिता मुंदडा ज्या केज च्या विद्यमान आमदार आहेत ,त्यांचे ते कार्यकर्ते , देशमुख हे लोकसभेला पंकजा मुंडे यांचे बूथप्रमुख म्हणून काम केलं आहे . पण संतोष देशमुख अपहरण प्रकरणातील सर्व आरोपी हे वंजारी समाजाचे असल्याने ,मराठा समाजाला या प्रकरणाला जातीय किनार आहे हे वाटण साहजिक आहे . घुले , आंधळे, चाटे , कराड  .

४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ?

पण संतोष देशमुख प्रकरणा मध्ये
  खरा विजय हा देवेंद्र फडणवीस यांनी एका बाणात ३ पक्षी जरांगे पाटील , धनंजय आणि पंकजा मुंडे  कारण ,जरांगे पाटील यांना बीडच्या मोर्चा मध्ये सत्ताधारी पक्षाच(भाजप) कौतुक करावं लागलं कारण १)धस २)मुंदडा ३)नरेंद्र पाटील ४) अभिमन्यू पवार यासारख्या भाजप आमदारांचा पाठिंबा या मोर्चाला असल्याने जरांगे
यांची चांगलीच पंचाईत झाली, आणि नंतर त्यांना अजित पवारांवर पण , बोलता आलं नाही कारण , १) सोळंके २) पंडित ३)विटेकर हे पण अजित पवारांचे आमदार मोर्चा मध्ये उपस्थित होते.
 धनंजय मुंडे यांचे वाढणारे राजकीय अस्तित्व आणि पंख देशमुख प्रकरणाच्या निमित्ताने फडणवीस यांनी छाटले .

बीड क
 बीड मध्ये बिहार होण्याला सुरुवात खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांनी केली !
आणि याला जातीय किनार सुद्धा आहे बरका . 
कारण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या सोयीनुसार बीड मध्ये वंजारी समाजाच्या अधिकारी , शिक्षक , जी बिंदूनामावली च्या विरुद्ध जाऊन भरती करण्याची सुरुवात केली .
याचे समकालीन पुरावे उपलब्ध आहेत..
हीच रेघ पुढे पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री झाल्यानंतर ,वाल्मीक कराडांच्या मदतीने बीडला बिहार करून दाखवले .
बीड मध्ये कायम दुष्काळ , पाण्याची टंचाई , उद्योगधंद्यांची कमतरता, ऊसतोड मजुरांचा  जिल्हा म्हणून ओळख , शिक्षणाचा अभाव , आणि यातूनच होणारी दारिद्य्रता आणि वाढणारी गुंडगिरी .
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर बीडला सुध्रवण्याची संधी बीडकरांनी वारंवार मुंडे परिवाराला दिली, पण बीडच विकास सोडून ,स्वाजातीचा विकास आणि जातीच्या गुंडांना प्रोत्साहन देऊन ,इतर समाजावर मनगटाचा आणि आर्थिक कोंडी करणे हे मुंडे परिवाराने केले
 . 

* धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडांचे प्रताप ?

धनंजय मुंडे २०१९ साली पंकजा मुंडे चा पराभव करण्याच्या आधी ते विधानपरषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार होते आणि विरोधी पक्षनेते सुद्धा होते .
२०१९ नंतर धनंजय मुंडे यांनी परळी ची सूत्रे कराड यांच्या कडे दिली . यातून कराड यांनी अफाट संपत्ती , गुंडांच्या टोळ्या , आणि मानस सुद्धा कमवाली,
गोपीनाथ मुंडें यांच्या घरात घरघडी असणारा वाल्मीक आता पूर्ण बीडचा (अण्णा ) झाला , 
औद्योगिक विदुत प्रकल्प यातील राख असो
वा कुनला खंडणी वसूल करण असो ,किंवा निवडणुकीत दमदाटी , मारहाण करून जरब बसवणे असो, वाल्मीक कराड ने परळी च बिहार करून दाखवले ,
कंबरेला बंदूक ठेवून फिरणारा वाल्मीक कराड ने विरोधक आणि  गोरगरीब मानस ते राज्याचे  मंत्री या सर्वांच्या जवळचा झाला...


असो , आता फडणवीस यांच्यावर सगळ्या महाराष्ट्राची नझर आहे...
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...

देशाचे एकमेव यशस्वी कृषीमंत्री शरदचंद्र पवार ! जरूर वाचा !

कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं. "छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करून इतिहास घडवला आहे ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार" असं पत्र संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 साली देशाचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले होते. भाजपाला शेतकऱ्यांऐवजी भांडवलदारांचा पुळका जास्त असल्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कृषी मंत्री हे पद दुय्यम दर्जाचं बनलं होतं. मात्र शरद पवार यांनी या खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्यावेळेस यूपीए सरकार आकार घेत होतो त्यावेळेस प्रणव मुखर्जी शरद पवार यांना भेटायला गेले तेव्हा शरद पवार गृह, अर्थ, परराष्ट्र किंवा संरक्षण यापैकी एखादा खात मागतील असं त्यांना वाटलं होतं पण शरद पवार यांनी कृषीमंत्री पद मागून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हे करत असताना शरद पवार यांनी त्यांना एक अ...